शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

केलेले काम जनतेपर्यंंत पोहोचविण्यात काँग्रेसला अपयश!

By admin | Published: October 15, 2015 1:01 AM

मोदी सरकारचा खोटारडेपणा जनतेपुढे आणू, पत्रकार परिषदेत विनायकराव देशमुख यांचे वक्तव्य.

अकोला- काँग्रेसच्या कार्यकाळात गोर-गरिबांसाठी अनेक योजना राबविण्यात आल्यात. या योजनांवर झालेले काम जनतेपर्यंंत पोहोचविण्यात काँग्रेसला अपयश आल्याची कबुली देत मोदी सरकारचा खोटारडेपणा जनतेपुढे आणू, असा इशारा काँग्रेसच्या योजना संनियंत्रण समितीचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव देशमुख यांनी बुधवारी अकोला येथे दिला. काँग्रेसच्या संनियंत्रण समितीची सभा अकोला येथे न्यू राधाकिशन प्लॉटमधील अग्रसेन भवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये समितीच्या कार्याबाबत चर्चा करण्यात आली. जनहितासाठी योजनांमध्ये आवश्यक बदल करण्याच्या मागणीचे निवेदनही जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. त्यानंतर विनायकराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, विदर्भ आणि मराठवाड्यातील जनसेवकांची डिसेंबरमध्ये सभा आयोजित केली असल्याची माहिती दिली. त्यासाठी विदर्भात बुधवारपासून जिल्हानिहाय बैठक आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारकडून जनतेला खोटी आश्‍वासने दिली जात असल्याचा आरोप केला. काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू असलेल्या योजनांची नावे बदलून आणि सामान्य जनतेला त्याचा फायदा मिळणार नाही, अशा पद्धतीने योजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिष्यवृत्तीचे नियम बदल्याने ओबीसी विद्यार्थ्यांंंना शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागणार असल्याचे ते म्हणाले. विरोधासाठी विरोध नसून, केंद्रात आणि राज्यात सत्तेवर बसलेले लोक इतिहासाची चाक उलटी फिरविण्याचा प्रयत्न करून लोकांची फसवणूक करीत आहेत. लोकांची फसवणूक होऊ नये, यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आता सरकारचा खोटारडेपणा जनतेपुढे मांडणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला अमरावती विभागाचे प्रभारी श्याम उमाळकर, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, बबनराव चौधरी, अविनाश देशमुख, अनंत बगाडे, कपिल रावदेव, राजेंद्र कोळकर, महेश गणगणे, उषा विरक, वर्षा बडगुजर, आलमगीर खान आदींची उपस्थिती होती.