शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

काँग्रेस अन् आंबेडकरांचे एकमेकांवर दबावतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 12:26 IST

आंबेडकर व काँग्रेस यांच्यामधील चर्चा बिनसल्यावर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर जाणीवपूर्वक आघाडीचे बारा वाजविल्याचे आरोप करतात.

अकोला: भारिप बमसंचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आघाडी करून त्यांना अकोला लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यास प्राधान्य द्यावे. आघाडी होत असेल तर उत्तमच, अन्यथा स्वबळावर लढावे असा सूर काँग्रेसच्या बैठकीत निघाला होता. लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर अकोला लोकसभा मतदारसंघाच्या स्थितीबाबत शुक्रवार १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत आढावा घेतला असता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थित अकोल्याच्या स्थितीवर मंथन झाले होते. आता तीन महिने उलटल्यावरही काँग्रेस अन् आंबेडकर यांच्या आघाडीचा गुुंताच आहे; मात्र या दरम्यानच्या काळात दोहोंनी एकमेकांवर दबावतंत्राचे राजकारण कायम ठेवत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्याचाच प्रयत्न असल्याचे भासविणे सुरू केले आहे.अकोला लोकसभा मतदारसंघातील समीकरणांचा विचार केला तर भाजपाला थांबविण्यासाठी काँग्रेसला अ‍ॅड. आंबेडकरांची साथ हवी आहे. यापूर्वी १९९८ व १९९९ मध्ये काँग्रेस सोबत अ‍ॅड. आंबेडकरांच्या साथीने यश मिळविले होते. त्यांची पुनरावृत्ती २०१९ च्या निवडणुकीत व्हावी, असा मानस काँग्रेसचा आहे. तर दुसरीकडे काँगे्रसची साथ सोडल्यानंतर अ‍ॅड. आंबेडकरांनाही अकोला जिंकता आले नाही हा इतिहास आहे, त्यामुळे काँग्रेसनेही आंबेडकरांच्या अटी, शर्थी मान्य करून त्यांना सन्मान देत अकोला जिंकावे, असे आंबडेकरांच्या समर्थकांनाही वाटते. त्यामुळे आघाडीच्या प्रयत्नांकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहे. आंबेडकर व काँग्रेस यांच्यामधील चर्चा बिनसल्यावर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर जाणीवपूर्वक आघाडीचे बारा वाजविल्याचे आरोप करतात. त्यामुळे आघाडीत आमच्यामुळे बिघाडी झाली हा संदेश आपल्याकडून जाऊ नये याची काळजी घेत दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव कायम ठेवताना दिसत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे पत्ते खुलेएकीकडे अ‍ॅड. आंबेडकर व काँग्रेस यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचे चित्र असतानाच दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात एकापाठोपाठ एक असे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर होत आहेत. एका अर्थाने हा काँग्रेसवर दबाव असला तरी दुसरीकडे स्वबळावरच निवडणूक लढवायची आहे, असे संकेत कार्यकर्त्यांना दिले जात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने भारिप-बमसंनेच आपले पत्ते खुले केल्याचे स्पष्ट चित्र या निमित्ताने दिसत आहे. काँग्रेसकडून पर्यायांची चाचपणीप्रदेश काँग्रेसकडे उमेदवारीसाठी गेलेल्या नावांमध्ये डॉ. अभय पाटील, डॉ. अरुण भागवत, डॉ. संजीवनी बिहाडे, डॉ. पुरुषोत्तम दातकर, डॉ. सुधीर ढोणे, सै. कमरोद्दीन या नावांचा समावेश असला तरी डॉ. अभय पाटील यांचे नाव अग्रक्रमाने आहे. अभय पाटलांसोबतच गेल्या चार दिवसात माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे नाव चांगलेच चर्चेत आले होते. खुद्द अनंतराव यांनीही दिल्ली दरबारी हजेरी लावून पक्षश्रेष्ठींसोबत मसलतही केली; मात्र आता पुन्हा आणखी एखादा पर्याय मिळतो का, याची चाचपणी पक्षश्रेष्ठी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसची आघाडी झाली नाही तर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे भारिप-बमसंचे उमेदवार राहतील, हे स्पष्टच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे वळणारी मते थांबविण्यासोबतच खासदार संजय धोत्रे यांच्या मतपेढीला धक्का देणारा मराठा उमेदवारच काँग्रेसची पसंती राहणार आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसAkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर