शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

विद्यापीठांच्या परीक्षांविषयी संभ्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 10:21 IST

विद्यापीठांच्या परीक्षांचे भवितव्य यूजीसी समितीच्या अहवालावर अवलंबून आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांविषयी संभ्रम कायम आहे.

ठळक मुद्दे२२ मार्चपासून राज्यातील सर्वच महाविद्यालये बंद आहेत.एप्रिल-मेमध्ये परीक्षा घेऊन जुलैपर्यंत निकाल लावणे अपेक्षित आहे. सेमिस्टर पॅटर्न विद्यापीठांसमोर अडचणीचे ठरणार आहे.

- संदीप वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी २२ मार्चपासून लॉकडाउन करण्यात आले असून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे, राज्यातील विद्यापीठांनापरीक्षांचे वेळापत्रक रद्द करावे लागले. विद्यापीठांच्यापरीक्षांचे भवितव्य यूजीसी समितीच्या अहवालावर अवलंबून आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांविषयी संभ्रम कायम आहे.२२ मार्चपासून राज्यातील सर्वच महाविद्यालये बंद आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमही पूर्ण झाला नव्हता, तसेच मौखिक व प्रात्याक्षिक परीक्षाही घेता आल्या नाहीत, तसेच विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रकही रद्द करावे लागले. २१ दिवसांचा लॉकडाउन पुन्हा वाढल्याने परीक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ३ मेपर्यंत व त्यानंतरही लॉकडाउन कायम राहिल्यास परीक्षा घ्यायच्या किंवा नाही, घ्यायच्या तर कशा व कोणत्या पद्धतीने घ्याव्या, यावर निर्णय घेण्यासाठी यूजीसीने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती परीक्षांविषयी आपल्या शिफारसी सरकारकडे सादर करणार आहे. या शिफारसींवरच विद्यापीठांच्या परीक्षांचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या स्थितीमुळे निर्माण झालेल्या परीक्षांचा पेच सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनानेही सहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीने ६ एप्रिलपासून कामही सुरू केले आहे; मात्र यूजीसी समितीच्या शिफारसी आल्यानंतर ही समिती आपला अहवाल राज्य शासनास सादर करणार आहे. त्यानंतर राज्य शासन राज्यातील विद्यापीठांना परीक्षांविषयी आदेश देणार आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांविषयी संभ्रम कायम आहे.सेमिस्टर पॅटर्नमुळे अडचणराज्यातील अनेक विद्यापीठांनी सेमिस्टर पॅटर्न सुरू केला आहे. त्यामुळे एप्रिल-मेमध्ये परीक्षा घेऊन जुलैपर्यंत निकाल लावणे अपेक्षित आहे. कारण जुलैपासून नवे सेमिस्टर सुरू होते. यावर्षी एप्रिलमध्ये सेमिस्टरच्या परीक्षा सुरूच झाल्या नसल्याने पुढील वर्गात प्रवेश घेण्याची प्रक्रियाही रखडणार आहे, तसेच बारावीचा निकालही लांबण्याची शक्यता असल्याने यावर्षी नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. लॉकडाउनमुळे सेमिस्टर पॅटर्न विद्यापीठांसमोर अडचणीचे ठरणार आहे.

विद्यापीठांच्या परीक्षांबाबत यूजीसीने समिती नेमली आहे, तसेच राज्य सरकारचीही सहा सदस्यीय समिती आहे. या समित्यांच्या शिफारशींनंतर शासन ज्या प्रमाणे आदेश देईल, त्या प्रमाणे परीक्षा घेण्यात येणार आहेत.- डॉ. हेमंत देशमुख, परीक्षा नियंत्रक,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षाuniversityविद्यापीठ