शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

विद्यापीठांच्या परीक्षांविषयी संभ्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 10:21 IST

विद्यापीठांच्या परीक्षांचे भवितव्य यूजीसी समितीच्या अहवालावर अवलंबून आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांविषयी संभ्रम कायम आहे.

ठळक मुद्दे२२ मार्चपासून राज्यातील सर्वच महाविद्यालये बंद आहेत.एप्रिल-मेमध्ये परीक्षा घेऊन जुलैपर्यंत निकाल लावणे अपेक्षित आहे. सेमिस्टर पॅटर्न विद्यापीठांसमोर अडचणीचे ठरणार आहे.

- संदीप वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी २२ मार्चपासून लॉकडाउन करण्यात आले असून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे, राज्यातील विद्यापीठांनापरीक्षांचे वेळापत्रक रद्द करावे लागले. विद्यापीठांच्यापरीक्षांचे भवितव्य यूजीसी समितीच्या अहवालावर अवलंबून आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांविषयी संभ्रम कायम आहे.२२ मार्चपासून राज्यातील सर्वच महाविद्यालये बंद आहेत. अनेक महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमही पूर्ण झाला नव्हता, तसेच मौखिक व प्रात्याक्षिक परीक्षाही घेता आल्या नाहीत, तसेच विद्यापीठांच्या परीक्षांचे वेळापत्रकही रद्द करावे लागले. २१ दिवसांचा लॉकडाउन पुन्हा वाढल्याने परीक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ३ मेपर्यंत व त्यानंतरही लॉकडाउन कायम राहिल्यास परीक्षा घ्यायच्या किंवा नाही, घ्यायच्या तर कशा व कोणत्या पद्धतीने घ्याव्या, यावर निर्णय घेण्यासाठी यूजीसीने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती परीक्षांविषयी आपल्या शिफारसी सरकारकडे सादर करणार आहे. या शिफारसींवरच विद्यापीठांच्या परीक्षांचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या स्थितीमुळे निर्माण झालेल्या परीक्षांचा पेच सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनानेही सहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीने ६ एप्रिलपासून कामही सुरू केले आहे; मात्र यूजीसी समितीच्या शिफारसी आल्यानंतर ही समिती आपला अहवाल राज्य शासनास सादर करणार आहे. त्यानंतर राज्य शासन राज्यातील विद्यापीठांना परीक्षांविषयी आदेश देणार आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांविषयी संभ्रम कायम आहे.सेमिस्टर पॅटर्नमुळे अडचणराज्यातील अनेक विद्यापीठांनी सेमिस्टर पॅटर्न सुरू केला आहे. त्यामुळे एप्रिल-मेमध्ये परीक्षा घेऊन जुलैपर्यंत निकाल लावणे अपेक्षित आहे. कारण जुलैपासून नवे सेमिस्टर सुरू होते. यावर्षी एप्रिलमध्ये सेमिस्टरच्या परीक्षा सुरूच झाल्या नसल्याने पुढील वर्गात प्रवेश घेण्याची प्रक्रियाही रखडणार आहे, तसेच बारावीचा निकालही लांबण्याची शक्यता असल्याने यावर्षी नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. लॉकडाउनमुळे सेमिस्टर पॅटर्न विद्यापीठांसमोर अडचणीचे ठरणार आहे.

विद्यापीठांच्या परीक्षांबाबत यूजीसीने समिती नेमली आहे, तसेच राज्य सरकारचीही सहा सदस्यीय समिती आहे. या समित्यांच्या शिफारशींनंतर शासन ज्या प्रमाणे आदेश देईल, त्या प्रमाणे परीक्षा घेण्यात येणार आहेत.- डॉ. हेमंत देशमुख, परीक्षा नियंत्रक,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षाuniversityविद्यापीठ