शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

अन्नधान्य मिळण्यास उशिर झाल्यास मिळणार भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 17:50 IST

लाभार्थ्याला धान्य मिळण्यास उशिर झाल्यास भरपाई देण्याचीही तयारी दर्शवली

अकोला : केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ लागू केल्यानंतर राज्य शासनानेही महाराष्ट्र अन्न सुरक्षा अधिनियम २०१९ मध्ये विविध तरतुदी करत लाभार्थ्याला धान्य मिळण्यास उशिर झाल्यास भरपाई देण्याचीही तयारी दर्शवलीआहे. त्यासाठी अधिनियमानुसार अपर जिल्हाधिकारी यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित केले आहे. मात्र, ग्राहकांपर्यत ही माहितीच न पोहचल्याने तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे तक्रारींचे प्रमाणही नगण्यच असल्याची माहिती आहे.महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा अधिनियम २०१९ नुसार तक्रार निवारण यंत्रणाही अस्तित्वात आली आहे. ग्राहकांना तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीतून अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत अन्नधान्ये किंवा अन्नपदार्थाच्या वितरणाशी संबंधित बाबींमुळे ग्राहकांवर अन्याय होत असल्यास त्याने केलेल्या तक्रारीचे शिघ्रतेने तसेच प्रभावीपणे निवारण करण्याची जबाबदारी जिल्हा तक्रार निवारण अधिकाऱ्यांची आहे. जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून प्रत्येक जिल्'ात अपर जिल्हाधिकाºयांची जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे. तसेच या अधिनियमानुसार तक्रार निवारण अधिकाºयाला विशेष अधिकारही देण्यात आले आहेत. त्याद्वारे कोणत्याही वस्तूची तपासणी करणे, लेखापुस्तके, दस्तऐवजाची तपासणी करता येते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला अन्नधान्ये, अन्नपदार्थ वितरणाशी संबंधित कोणतीही तक्रार असल्यास ती तक्रार निवारण अधिकाºयांकडे नोंदवता येते. त्यासाठी व्यक्तीश:, टपालाद्वारे प्राप्त तक्रारींचाही शक्य तितक्या लवकर निपटारा करण्याची जबाबदारही तक्रार निवारण अधिकाºयांची आहे. प्राप्त तक्रारींवर चौकशी करणे, सुनावणी घेणे, तसेच संबंधितांना समन्सही बजावून उपस्थित ठेवण्याचाही आदेश तक्रार निवारण अधिकाºयाला देता येतो. तथ्य आढळून आलेल्या तक्रारीनुसार कारवाई करण्याचीही तरतूद अधिनियमात आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून तीस दिवसाच्या कालावधीत अन्नधान्य न मिळाल्यास संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची पूर्तता करण्यासाठी त्या कालावधीत अन्न सुरक्षा भत्ता देण्याचीही तरतूद आहे. गरिब लाभार्थ्यांसाठी असलेल्या अधिनियमातील तरतुदींबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती न झाल्याने अनेकांना त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित ठेवल्यानंतरही कुणावर कोणतीच कारवाई नजिकच्या काळात झालेली नाही, हे विशेष.

टॅग्स :Akolaअकोला