शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

अन्नधान्य मिळण्यास उशिर झाल्यास मिळणार भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 17:50 IST

लाभार्थ्याला धान्य मिळण्यास उशिर झाल्यास भरपाई देण्याचीही तयारी दर्शवली

अकोला : केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ लागू केल्यानंतर राज्य शासनानेही महाराष्ट्र अन्न सुरक्षा अधिनियम २०१९ मध्ये विविध तरतुदी करत लाभार्थ्याला धान्य मिळण्यास उशिर झाल्यास भरपाई देण्याचीही तयारी दर्शवलीआहे. त्यासाठी अधिनियमानुसार अपर जिल्हाधिकारी यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित केले आहे. मात्र, ग्राहकांपर्यत ही माहितीच न पोहचल्याने तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे तक्रारींचे प्रमाणही नगण्यच असल्याची माहिती आहे.महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा अधिनियम २०१९ नुसार तक्रार निवारण यंत्रणाही अस्तित्वात आली आहे. ग्राहकांना तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीतून अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत अन्नधान्ये किंवा अन्नपदार्थाच्या वितरणाशी संबंधित बाबींमुळे ग्राहकांवर अन्याय होत असल्यास त्याने केलेल्या तक्रारीचे शिघ्रतेने तसेच प्रभावीपणे निवारण करण्याची जबाबदारी जिल्हा तक्रार निवारण अधिकाऱ्यांची आहे. जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून प्रत्येक जिल्'ात अपर जिल्हाधिकाºयांची जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे. तसेच या अधिनियमानुसार तक्रार निवारण अधिकाºयाला विशेष अधिकारही देण्यात आले आहेत. त्याद्वारे कोणत्याही वस्तूची तपासणी करणे, लेखापुस्तके, दस्तऐवजाची तपासणी करता येते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला अन्नधान्ये, अन्नपदार्थ वितरणाशी संबंधित कोणतीही तक्रार असल्यास ती तक्रार निवारण अधिकाºयांकडे नोंदवता येते. त्यासाठी व्यक्तीश:, टपालाद्वारे प्राप्त तक्रारींचाही शक्य तितक्या लवकर निपटारा करण्याची जबाबदारही तक्रार निवारण अधिकाºयांची आहे. प्राप्त तक्रारींवर चौकशी करणे, सुनावणी घेणे, तसेच संबंधितांना समन्सही बजावून उपस्थित ठेवण्याचाही आदेश तक्रार निवारण अधिकाºयाला देता येतो. तथ्य आढळून आलेल्या तक्रारीनुसार कारवाई करण्याचीही तरतूद अधिनियमात आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून तीस दिवसाच्या कालावधीत अन्नधान्य न मिळाल्यास संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची पूर्तता करण्यासाठी त्या कालावधीत अन्न सुरक्षा भत्ता देण्याचीही तरतूद आहे. गरिब लाभार्थ्यांसाठी असलेल्या अधिनियमातील तरतुदींबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती न झाल्याने अनेकांना त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित ठेवल्यानंतरही कुणावर कोणतीच कारवाई नजिकच्या काळात झालेली नाही, हे विशेष.

टॅग्स :Akolaअकोला