शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच बदलल्याने महाविद्यालयीन निवडणुका अधांतरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:35 IST

विधानसभा निवडणुकीमुळे महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलल्या; परंतु आता भाजप सरकार बदलून, महाविकास आघाडीचे सरकार आले आहे.

अकोला : देशातील इतर राज्यांत ज्या पद्धतीने खुल्या निवडणुका होतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात शासनाने तब्बल २९ वर्षांनंतर महाविद्यालयीन निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. विद्यापीठांना नियमावली जाहीर करून अधिसूचनासुद्धा काढल्या होत्या; परंतु विधानसभा निवडणुकीमुळे महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलल्या; परंतु आता भाजप सरकार बदलून, महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे महाविद्यालयीन निवडणुका रद्द होणार असल्याची चर्चा विद्यार्थी संघटनांमध्ये सुरू झाली आहे. निवडणुकीसंदर्भात विद्यापीठ प्रशासनाला कोणत्याही सूचना नाहीत.तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सर्व विद्यार्थी संघटनांची बैठक घेऊन महाविद्यालयात खुल्या पद्धतीने निवडणुका घेण्याबाबत चर्चा केली होती. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी आनंद व्यक्त केला. एवढेच नाही तर निवडणुका घेण्याचे शासनाने घोषितसुद्धा केले होते. त्यानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघ खुल्या निवडणुकीचा कार्यक्रम विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे जाहीरसुद्धा करण्यात आला होता. ४ सप्टेंबरला मतदानसुद्धा होणार होते; परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्यात आल्यामुळे महाविद्यालयीन निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन झाले असते तर महाविद्यालयीन निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असता; परंतु आता राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता महाविद्यालयीन निवडणुका होतील की नाही, याविषयी अस्पष्टता आहे. महाविद्यालयीन निवडणुकांविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष उदासीन असल्यामुळे निवडणुकांचा कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही युवा नेतृत्वाला संधी मिळणार की नाही, असा प्रश्न विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे.निवडणुका घेण्यास भाग पाडू!खुल्या पद्धतीने महाविद्यालयीन निवडणुकांचा विद्यापीठाने कार्यक्रम जाहीर केला होता; परंतु आता सरकार बदलले आहे. नव्या सरकारला महाविद्यालयीन निवडणुका घेण्यासाठी भाग पाडू, अशी भूमिका काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटना एनएसयूआयचे प्रदेश महासचिव आकाश कवडे, अभाविपचे जिल्हा संयोजक मनीष फाटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महानगराध्यक्ष शैलेश बोदडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नितेश किर्तक, पवन गवई यांनी घेतली आहे. अनेक वर्षांपासून युवा नेतृत्व समोर आले नाही. युवकांनी संधी मिळत नाही. महाविद्यालय निवडणुका घेतल्या तर युवकांनी नेतृत्वाची संधी मिळेल, अशी अपेक्षाही विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूकcollegeमहाविद्यालय