शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

सरकारच बदलल्याने महाविद्यालयीन निवडणुका अधांतरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:35 IST

विधानसभा निवडणुकीमुळे महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलल्या; परंतु आता भाजप सरकार बदलून, महाविकास आघाडीचे सरकार आले आहे.

अकोला : देशातील इतर राज्यांत ज्या पद्धतीने खुल्या निवडणुका होतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात शासनाने तब्बल २९ वर्षांनंतर महाविद्यालयीन निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. विद्यापीठांना नियमावली जाहीर करून अधिसूचनासुद्धा काढल्या होत्या; परंतु विधानसभा निवडणुकीमुळे महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलल्या; परंतु आता भाजप सरकार बदलून, महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे महाविद्यालयीन निवडणुका रद्द होणार असल्याची चर्चा विद्यार्थी संघटनांमध्ये सुरू झाली आहे. निवडणुकीसंदर्भात विद्यापीठ प्रशासनाला कोणत्याही सूचना नाहीत.तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सर्व विद्यार्थी संघटनांची बैठक घेऊन महाविद्यालयात खुल्या पद्धतीने निवडणुका घेण्याबाबत चर्चा केली होती. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी आनंद व्यक्त केला. एवढेच नाही तर निवडणुका घेण्याचे शासनाने घोषितसुद्धा केले होते. त्यानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संघ खुल्या निवडणुकीचा कार्यक्रम विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे जाहीरसुद्धा करण्यात आला होता. ४ सप्टेंबरला मतदानसुद्धा होणार होते; परंतु विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्यात आल्यामुळे महाविद्यालयीन निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन झाले असते तर महाविद्यालयीन निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असता; परंतु आता राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता महाविद्यालयीन निवडणुका होतील की नाही, याविषयी अस्पष्टता आहे. महाविद्यालयीन निवडणुकांविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष उदासीन असल्यामुळे निवडणुकांचा कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही युवा नेतृत्वाला संधी मिळणार की नाही, असा प्रश्न विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे.निवडणुका घेण्यास भाग पाडू!खुल्या पद्धतीने महाविद्यालयीन निवडणुकांचा विद्यापीठाने कार्यक्रम जाहीर केला होता; परंतु आता सरकार बदलले आहे. नव्या सरकारला महाविद्यालयीन निवडणुका घेण्यासाठी भाग पाडू, अशी भूमिका काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटना एनएसयूआयचे प्रदेश महासचिव आकाश कवडे, अभाविपचे जिल्हा संयोजक मनीष फाटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महानगराध्यक्ष शैलेश बोदडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नितेश किर्तक, पवन गवई यांनी घेतली आहे. अनेक वर्षांपासून युवा नेतृत्व समोर आले नाही. युवकांनी संधी मिळत नाही. महाविद्यालय निवडणुका घेतल्या तर युवकांनी नेतृत्वाची संधी मिळेल, अशी अपेक्षाही विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूकcollegeमहाविद्यालय