शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

थंडी वाढणार; आठवड्यात करावा लागणार गार वाऱ्यांचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 1:39 PM

सध्या उत्तरेकडून थंड हवेचे वारे वाहत असल्याने विदर्भात थंडी वाढली असून, हे वातावरण आठवडाभर राहण्याची शक्यता आहे

अकोला : उत्तरेकडील गार वारे राज्याच्या दिशेकडे वाहत असल्याने विदर्भात थंडी वाढली असून, किमान सरासरी तापमान घटले आहे. हे थंड वारे आठवडाभर राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर नैसर्गिक थंडी वाढणार असल्याचा अंदाज कृषी हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. दरम्यान,१० जानेवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.२ अंश नोंदविण्यात आले.गत चोवीस तासांत शुक्रवार, १० जानेवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर उर्वरित भागात किंचित घट झाली. शुक्रवारी दिवसभर गार वारे वाहत होते. त्यामुळे अकोल्याचे किमान तापमान घटून १०.७ अंशावर आले. बुलडाणा १०.२, वाशिम १०.२, अमरावती १०.०, यवतमाळ ११.०, वर्धा १०.४, नागपूर १०.१ तर चंद्रपूरचे किमान तापमान १२.५ अंश होते.सध्या उत्तरेकडून थंड हवेचे वारे वाहत असल्याने विदर्भात थंडी वाढली असून, हे वातावरण आठवडाभर राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर नैसर्गिक थंडी वाढणार असल्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. आर. एन. साबळे यांनी वर्तविली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाweatherहवामान