शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

म्हैसांग येथे दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 1:37 AM

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैसांग  येथे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गायरान जमिनीवरील  अतिक्रमण काढण्याच्या वादावरून गावातील नागरिक  आणि अतिक्रमकांत तुफान हाणामारी झाल्याने यात जवळ पास १0 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी  सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली असून, पोलिसांनी  याप्रकरणी दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल केले  आहेत.

ठळक मुद्देगायरान जमिनीचा वाद चिघळला१0 जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैसांग  येथे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गायरान जमिनीवरील  अतिक्रमण काढण्याच्या वादावरून गावातील नागरिक  आणि अतिक्रमकांत तुफान हाणामारी झाल्याने यात जवळ पास १0 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी  सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली असून, पोलिसांनी  याप्रकरणी दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल केले  आहेत.म्हैसांग येथील सर्व्हे नं २५ मध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात  उत्तरेला जवळपास ७५ एकर गायरान जमीन आहे. त्या  जमिनीवर गावातील काही लोकांनी मागील १५ वषार्ंपासून  अतिक्रमण केले असून, त्यावर ते लोक पीक घेतात; परंतु  गावातील नागरिकांनी त्यांच्या जनावरांना चरायला  गायरानाची जमीन शिल्लक नसल्याने ग्रामपंचायतीला ते  अतिक्रमण काढण्यास सांगितले. त्यानुसार सन २0१२ मध्ये  ग्रामपंचायतीने गायरानावरील अतिक्रमकांना जमीन खाली  करण्याबाबत नोटीस बजावल्या होत्या. त्याला विरोध करीत  अतिक्रमकांनी नागपूर हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता.  त्यामुळे सदरचे प्रकरण हे न्यायालयीन असल्याने सदर  प्रकरण विभागीय आयुक्तांकडे आहे, असे लोकांना सांगण्या त आले. त्याला न जुमानता गावातील शेकडो नागरिक  आणि ग्रामपंचायत प्रशासनाने बोरगाव मंजू ठाणेदार पी. के.  काटकर यांना पोलीस संरक्षण मागितले होते; पण सदरचे  प्रकरण हे न्यायालयीन असल्याने त्यात पोलिसांना बंदोबस्त  देता येत नाही, असे ठाणेदार काटकर यांनी समजावले,  त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य आणि काही नागरिकांनी  १७  तारखेला अमरावती विभागीय आयुक्तांना भेटून या गायरान  जमिनीबाबत काही प्रकरण आपल्या स्तरावर प्रलंबित आहे  का, असे विचारले असता, विभागीय आयुक्तांनी त्यांच्याकडे  असे कोणतेच प्रकरण प्रलंबित नाही, असे लेखी पत्र ग्राम पंचायतीला दिले, त्यामुळे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष नरेंद्र  देशमुख, पोलीस पाटील सुनील पायदाळे, सरपंच उषा गवई,  ग्रा.पं. सदस्य गजानन बाभुळकार आणि गावातील नागरिक  असे सर्व जण गावालगत असलेल्या गायरान शेतात  त्यांच्यासोबत जनावरे घेऊन गेले. तेव्हा तेथे दोन्ही गटात प्र थम शाब्दीक वाद होऊन नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत  झाले. या हाणामारीत अतिक्रमकांमधील श्रीकृष्ण तायडे,  गणेश तायडे, ज्योती सोळंके, गणेश सोळंके, दिलीप  सोळंके, मारोती गवई, वंदना गवई, प्रतिभा गवई, दुर्गा सावळे  हे नऊ नागरिक जखमी झाले, तसेच यावेळी दुसर्‍या गटात  असलेले गावातील काही नागरिक किरकोळ जखमी झाले.  यामुळे म्हैसांग गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले  आहे. दरम्यान, ठाणेदार पी. के. काटकर यांनी परिस्थिती  नियंत्रणात आणून जखमींना अकोला येथे उपचारार्थ भरती  केले असून, दोन्ही गटातील नागरिकांवर गुन्हे दाखल आणि  अटक करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान,  म्हैसांग गावात आता शांतता असून, गावात पोलीस बंदोबस्त  ठेवण्यात आला आहे.