चिखलगाव ग्रामसभेत प्रचंड गोंधळ!
By Admin | Updated: November 22, 2015 02:28 IST2015-11-22T02:28:38+5:302015-11-22T02:28:38+5:30
सभा तहकूब केल्याने ग्रामस्थ आक्रमक.

चिखलगाव ग्रामसभेत प्रचंड गोंधळ!
चिखलगाव (जि.अकोला ) : येथील ग्रामसभेत अध्यक्ष निवडीवरून शनिवारी प्रचंड गदारोळ झाला. ग्रामस्थांमधूनच ग्रामसभेच्या अध्यक्षांची निवड करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. मात्र, सरपंचांनी कोरभअभावी सभा तहकूब करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे सभेत प्रचंड गदारोळ झाला. चिखलगाव येथे शनिवारी १0 ते ११ या कालावधीत ग्रामसभा घेण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायततर्फे जाहीर करण्यात आले. यासाठी गावातून दवंडी देण्यात आली. त्यानुसार शनिवारी सकाळी ग्रामसभेसाठी ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर ग्रामसेवक गावंडे यांनी रजिस्टरवर ग्रामस्थांच्या स्वाक्षरी घेण्यास सुरुवात केली. सभेला ९५ पेक्षा जास्त ग्रामस्थ हजर होते. ग्रामस्थांनी सभेचे अध्यक्ष म्हणून रवी यादव यांचे नाव पुढे केले. मात्र, अचानक सभेची वेळ संपल्याचे सांगत सरपंच गोपाल थोरात यांनी कोरमअभावी सभा तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामसभेत गदारोळ होत असल्याची माहिती पातूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने चिखलगाव येथे धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढली आणि सचिवास घडलेल्या घटनाक्रमाची नोंद इतवृत्तामध्ये करण्यास सांगितले. सभेला रवी यादव, विजय तायडे, गोपाल ताथोड, अरुण अंभोरे, शरद तायडे, उमेश अंभोरे, विठ्ठल चांदूरकर आदी ग्रामस्थ हजर होते.