शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

 राज्यातील पाणी-चारा टंचाई निवारणाचा मुख्य सचिव घेणार लेखाजोखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 14:03 IST

अकोला: राज्यातील पाणी व चाराटंचाई निवारणासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा लेखाजोखा राज्याचे मुख्य सचिव यूपीएस मदान घेणार आहेत.

- संतोष येलकर

अकोला: राज्यातील पाणी व चाराटंचाई निवारणासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा लेखाजोखा राज्याचे मुख्य सचिव यूपीएस मदान घेणार आहेत. त्यासाठी ३ मे रोजी मुख्य सचिव संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत.दुष्काळी परिस्थितीत राज्यातील विविध भागात पाणी आणि चारा टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असून, जनावरांसाठी पाणी आणि चाराटंचाईचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाणी आणि चारा टंचाई निवारणासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा ३ मे रोजी राज्याचे मुख्य सचिव यूपीएस मदान घेणार आहेत. या आढावा बैठकीला राज्यातील विभागीय आयुक्तांसह संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या आढावा बैठकीत पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांसह टंचाई निवारणासाठी निधी मागणीचा आढावादेखील घेण्यात येणार आहे.पाणीपुरवठा योजनांच्या वीज देयकांची घेणार माहिती!सन २०१८-१९ मधील टंचाई कालावधीत गत आॅक्टोबर २०१८ पासून राज्यातील पाणीपुरवठा योजनांच्या चालू वीज देयकांची अदायगी यासंदर्भातही मुख्य सचिव आढावा बैठकीत माहिती घेणार आहेत.जिल्हानिहाय मागविली माहिती!राज्यातील पाणी व चाराटंचाई निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा मुख्य सचिव घेणार असल्याने, संबंधित मुद्यांची जिल्हानिहाय माहिती शासनाच्या पाणीपुरवठा विभागासह विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत मागविण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत माहिती सादर करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारdroughtदुष्काळ