शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत १९५ कि.मी. चे रस्ते होणार : ८५ कि.मी.च्या रस्त्यांना मंजुरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 1:45 AM

अकोला : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत  ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणल्या जाणार आहे. सन २0१७-२0१८ मध्ये जिल्ह्याच्या सातही तालुक्यांतील एकूण १९५ कि.मी.रस्त्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी ८५.५0 कि.मी.रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यी डॉ. रणजीत पाटील यांचा पुढाकार 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत  ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणल्या जाणार आहे. सन २0१७-२0१८ मध्ये जिल्ह्याच्या सातही तालुक्यांतील एकूण १९५ कि.मी.रस्त्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी ८५.५0 कि.मी.रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या  ८५ कि.मी.रस्त्यांसाठी ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून,  उर्वरित ११0 कि.मी. रस्त्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला असून, त्यांची मंजुरी मिळताच अनेक गावे मुख्य रस्त्यांशी जोडले जाणार आहेत. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच या रस्ता कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पालकमंत्री ना.डॉ. रणजित पाटील यांनी अकोला जिल्हय़ातील सातही तालुक्यांतील अनके गावे रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग ते राज्य महामार्गाला जोडण्यासाठी १९0 कि.मी. रस्त्यांचा प्रस्ताव तयार करून तातडीने शासनाकडे पाठविला होता. यासाठी निधीही मंजूर झाला असून, कामासही लवकरच प्रारंभ होणार आहे. उर्वरित १९५ कि.मी. मध्ये  २८ रस्त्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आला असून, यासाठी ८३ कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. गतवर्षीही या योजनेंतर्गत जिल्हय़त २३ रस्ते मंजूर झाले होते. या रस्त्यांचे काम ७0 टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम मे २0१८ पर्यंत पूर्ण होणार आहे. सन २0१६-१७ आणि सन २0१७-१८ मध्ये मंजूर झालेले रस्ते पूर्ण झाल्यानंतर जिल्हय़ातील बहुतांश गावे ना.डॉ. पाटील यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाशी जोडल्या जाणार आहेत.

पहिल्या टप्यातील गावे पहिल्या टप्प्यात अकोला तालुक्यातील धोतर्डी, वाकी, नावखे, गोणापूर, बोरगाव, सोनाळा, येळवण. अकोट तालुक्यातील बळेगाव जोड रस्ता, उमरा ते मक्रमपूर, नेव्होरी खुर्द. बाश्रीटाकळी तालुक्यातील गालटेक ते साखरविरा, फेट्रा, देवधरी ते धोतरखेड. बाळापूर तालुक्यातील हाता ते निंबा, वझेगाव पोच मार्ग, स्वरूपखेड रस्ता. मूर्तिजापूर तालुक्यातील राज्य महामार्ग ते शिवन ते धानोरा बु.रस्ता, राज्य महामार्ग ते शेलुबाजार ते एंडली जिल्हा हद्दीपयर्ंत. पातूर तालुक्यातील खानापूर रस्ता, देऊळगाव ते भानोस रस्ता, तेल्हारा तालुक्यातील दापुरा फाटा ते भांबेरी रस्ता, निंबोळी जोड रस्ता आदी रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांसाठी ५७ कोटी ११ लाख रुपये निधी मंजूर झाला असून, या रस्त्यांच्या कामाला लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना दळणवळणाची सुविधा प्राप्त करून देण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना महत्त्वाची ठरत आहे. येणार्‍या काळात जिल्ह्यातील एकही गाव रस्त्याविना राहणार नाही, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. - डॉ. रणजीत पाटील, पालकमंत्री, अकोला

टॅग्स :Dr.Ranjit Patilडॉ.रणजीत पाटीलAkola Ruralअकोला ग्रामीणroad safetyरस्ते सुरक्षा