शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा केंद्राचा घाट - अ‍ॅड.आंबेडकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 16:02 IST

ओबीसीचे विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून आरक्षणाअभावी वंचित राहिले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला.

अकोला : केंद्र सरकार हे ओबीसींविरोधी सरकार आहे. त्यामुळेच ओबीसीसाठी राखीव असलेल्या वैद्यकीय जागेवर या समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही. २०१७ पासून ते आजपर्यंत या धोरणामुळे ११000 ओबीसीचे विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून आरक्षणाअभावी वंचित राहिले आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला.स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, ओबीसीला कायद्यानुसार दिलेले २७ टक्के आरक्षणाची पूर्तता नीट द्वारे दिलेल्या वैद्यकीय प्रवेशामध्ये झालेली नाही. देशपातळीवरील आॅल इंडिया फेडरेशन आॅफ अदर बॅकवर्ड क्लासेसनी विस्तृत अशी आकडेवारी जाहीर करून ओबीसी आरक्षण संपविण्याचा केंद्राचा घाट उघड केला आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी आॅल इंडिया हा नॅशनल इलिजीबिलीटी एन्ट्रन्स टेस्ट (एन.ई.ई.टी.) मार्फत भरल्या जात असून, केंद्र शासनाने सदर प्रवेश प्रक्रियेमध्ये ओबीसीला आवश्यक असणारे आरक्षण सन २०१७ पासून कमी केले आहे व त्याचाच फटका ओबीसींना बसला आहे; परंतु केंद्र सरकारने नीटला हाताशी धरून कट आॅफमध्ये बदल घडवून ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा डाव रचला आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्र २०१७-१८, २०१९-२० या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ओबीसीला आरक्षणाचा फटका बसला आहे. त्यामुळे ओबीसीचे ११ हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत. वस्तुत: भारतीय राज्यघटनेच्या ९३ व्या दुरुस्तीनुसार केंद्र शासनाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे; परंतु केंद्र सरकार हे ओबीसींचे हक्क डावलणारे सरकार असून, आरक्षणच संपविण्याचा घाट या संस्थेने घातला असल्याचा आरोप त्यांनी केला. वंचितकडून आंदोलनाचा इशाराओबीसींना हक्क असणारे आरक्षण मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी आंदोलन करेल. वैद्यकीय प्रवेशासंदर्भातील अन्याय सरकारने तत्काळ दूर करावा, अन्यथा कोरोनाची भीती बाजूला ठेवून आम्ही ओबीसी विद्यार्थ्यांना आंदोलनाची हाक देऊ. वंचितच्या बॅनरखाली हे आंदोलन करणार असून, जेवढे आरक्षणवादी आहे ते सर्व या आंदोलनाला पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चिनी सैनिक मागे गेले, पुढे किती आले होते?भारत आणि चीनमधील तणाव ही नुरा कुस्ती आहे, असे मी मागेच म्हणालो होतो. आता चिनी सैन्य दोन किमी मागे सरकले, असे सरकार सांगत आहे. सरकारने चिनी सैनिक किती पुढे आले होते, याचेसुद्धा जनतेला स्पष्टीकरण द्यावे. उगाच माहिती लपविण्याचा प्रयत्न करू नये, असे आव्हान अ‍ॅड. आंबेडकर यांनी सरकारला दिले.

राज्य सरकार पडणार नाही-आंबेडकरराज्य सरकारमधील विविध पक्षांमध्ये कुरबुरी सुरू असल्या तरी सरकार पडणार नाही, असे दिसते. कोणत्याच आमदाराला आता निवडणुका नकोत. त्यामुळे आमदारांच्या दबावात हे सरकार चालेल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात आंबेडकर म्हणाले. सरकार कधी पडेल, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस देऊ शकतील. ते ज्योतिषी आहेत, मी नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर