शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

मध्य रेल्वेने केली २०.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 15:50 IST

मध्य रेल्वेने लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यानच्या १५० दिवसांत ऊर्जा, उद्योग व कृषी क्षेत्राची गरज पूर्ण करीत, २०.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे.

अकोला : कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असली, तरी या काळात ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी वस्तू व माल वेळेवर पोहोचविण्यासाठी मालगाड्या सुरू आहेत. मध्य रेल्वेने लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यानच्या १५० दिवसांत ऊर्जा, उद्योग व कृषी क्षेत्राची गरज पूर्ण करीत, २०.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे.देशांतर्गत मालवाहतुकीसाठी रेल्वेचा सर्वाधिक वापर होतो. अवजड उद्योग, कृषीपूरक साहित्य, ऊर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रातील मालवाहतुकीसाठी रेल्वे हा सर्वोत्तम पर्याय आहे. देशभरात लॉकडाऊनदरम्यान स्थलांतरितांना ने-आण करण्यासाठी काही गाड्या वगळता रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवा बंदच आहे. या काळात रेल्वेने मालवाहतूक मात्र पूर्ण क्षमतेने चालू ठेवली. लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून २३ मार्च २०२० ते अनलॉक-३ च्या १९ आॅगस्ट २०२० या १५० दिवसांच्या कालावधीत मध्य रेल्वेने ८,०२५ मालगाड्यांमधून कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड आणि स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर संकीर्ण वस्तूंची वाहतूक केली. या कालावधीत दररोज सरासरी २,५५८ वाघिणी मालाची वाहतूक केली. वाघिणी भारांच्या बाबतीत ३,८३,१८९ वाघिणींमध्ये २०.१३ दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली.अशी केली वाहतूकमध्य रेल्वेने अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी १,४५,३१५ कोळशाच्या वाघिणींचा पुरवठा विविध ऊर्जा प्रकल्पांना केला. तसेच ४,२४८ वाघिणींमधून अन्नधान्य आणि साखर; शेतकऱ्यांच्या हितासाठी १७,५३६ वाघिणी खते आणि ५,३०५ कांदा; पेट्रोलियम पदार्थांच्या ३७,८४० वाघिणी, लोह आणि स्टीलच्या ९,९०९ वाघिणी, सिमेंटच्या २५,११२ वाघिणी, १,१८,८२६ कंटेनर वाघिणी आणि सुमारे १९,०९८ वाघिणी डी-आॅइल केक व इतर वस्तूंची वाहतूक केली.

 

टॅग्स :railwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेAkolaअकोला