शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

दुष्काळात जनावरांना मिळेना भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 12:50 IST

अकोला : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पाणी आणि चाराटंचाईच्या स्थितीत जनावरे विकण्याशिवाय शेतकºयांसमोर पर्याय उरला नाही; मात्र बाजारातही जनावरांना भाव मिळत नसल्याने, कमी दरात जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

- संतोष येलकरअकोला : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत पाणी आणि चाराटंचाईच्या स्थितीत जनावरे विकण्याशिवाय शेतकºयांसमोर पर्याय उरला नाही; मात्र बाजारातही जनावरांना भाव मिळत नसल्याने, कमी दरात जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील सर्व गावांसह अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार महसूल मंडळातील गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. नापिकीच्या स्थितीत शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. नापिकीच्या स्थितीत चाºयाच्या उत्पादनातही घट झाली आहे. येत्या काही दिवसांत पाणी आणि चाराटंचाईची परिस्थिती आणखी तीव्र होणार असल्याने, जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे; मात्र बाजारातही भाव मिळत नसल्याने मिळणाºया कमी दरात शेतकºयांना जनावरे विकावी लागत आहेत.बाजारात जनावरांनाअसा मिळत आहे भाव!एक लाख रुपये किमतीच्या बैलजोडीला बाजारात ६० ते ६५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. ५५ हजार रुपये कि मतीच्या म्हशीला ३५ ते ४० हजार रुपये, ६ ते ७ हजार रुपये किमतीच्या शेळीला ३ ते ४ हजार रुपयांचा भाव मिळत असून, दुभत्या गायी-म्हशी आणि वहितीकरिता तयार होणाºया गुरांनाही बाजारात कमी भाव मिळत असल्याचे वास्तव आहे.पाणी-चारा कोठून आणणार?टंचाईच्या परिस्थितीत जिथे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे, तेथे जनावरांना जगविण्यासाठी पिण्याचे पाणी आणि चारा कोठून आणणार, याबाबतची चिंता पशुपालक शेतकºयांना सतावत आहे. त्यामुळे मिळणाºया कमी भावात जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.कडबा पेंढीचे भाव शेकडा पाच हजार रुपये!दुष्काळी परिस्थितीत चाºयाच्या उत्पादनात घट झाल्याने, चाºयाचे भाव वधारले आहेत. त्यामध्ये सध्या कडबा पेंढीचे भाव शेकडा पाच हजार रुपये असून, २० किलो कडबा कुट्टी पोत्याचे भाव ३४० रुपये आहेत. 

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पाणी आणि चाराटंचाईच्या परिस्थितीत जनावरे विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे; परंतु जनावरांना कमी भाव मिळत असून, मिळेल त्या भावात शेतकºयांना जनावरे विकावी लागत आहेत.-शिवाजी भरणे,शेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेतीdroughtदुष्काळ