शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

लग्न लागताच नवरी फुर्र; नवरदेवाला घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 21:05 IST

राजस्थानातील तरुण ठरला औटघटकेचा नवरदेव

अकोला : लग्न म्हणजे दोन जिवांचे मिलन. सुंदर, सालस मुलगी पसंत करून, लग्न करून सुखी संसार थाटावा, हे प्रत्येकाचे स्वप्न असते; परंतु झालेले लग्न जर औटघटकेचे ठरले तर स्वप्नांचा चुराडा होतो. असाच काहीसा प्रकार सोमवारी दुपारी अकोल्याजवळील रिधोरा गावाजवळ घडला. राजस्थानच्या युवकासोबत लग्नाचे सात फेरे घेतल्यानंतर नवरी व तिचे नातेवाईक ५0 हजार रुपयांसह पसार झाले. फसवणूक झालेल्या युवकाच्या तक्रारीची बाळापूर पोलिसांनी नोंद केली.देखणी, सुंदर मुलगी मिळावी आणि संसार सुखाचा व्हावा, असे स्वप्न अनेक जण रंगवतात. राजस्थानामधील एक ३0 वर्षीय युवक असेच स्वप्न रंगवित असताना, त्याला अकोल्यात एका मध्यस्थ व्यक्तीमार्फत एका युवतीकडून लग्नाचा प्रस्ताव आला. मध्यस्थाने युवती लग्नाची आहे. लग्नासाठी मुलीकडच्या लोकांना खर्चासाठी ५0 हजार रुपये द्यावे लागतील, असे युवकाला सांगितले. युवकही तयार झाला. सोमवारी तो अकोल्यात आल्यावर त्याला खदान परिसरातील एक युवती मध्यस्थाने दाखविली. मुलगी पसंत आल्यावर मध्यस्थाने लग्न उरकून घेण्याची घाई केली. युवकही बोहल्यावर चढण्यास चटकन तयार झाला. मध्यस्थ, युवती आणि तिच्या काही नातेवाइकांनी रिधोरा येथील एका मंदिरामध्ये लग्न लावण्याची तयारी दर्शवल्यानंतर सर्वजण मंदिरात आले. याठिकाणी मध्यस्थ, नातेवाइकांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह लावण्यात आला. एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातल्यानंतर सात फेरे घेण्यात आले आणि लग्न पार पडले. लग्न आटोपले. आता नवरीला राजस्थानला घेऊन जाऊ, या विचारात नवरदेव होता; परंतु आपल्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे, याची त्याला जराही कल्पना नव्हती.रिधोराजवळील एका हॉटेलवर नवरदेवाच्या खर्चाने सर्वांनी अल्पोपहार घेतला. यावेळी नवरी सासरी रवाना होण्यापूर्वी आम्ही तिची नातेवाइकांची शेवटची भेट घडवून आणतो. नंतर नवऱ्या मुलीची भेट होणार नाही, असे नातेवाइकांनी नवरदेवाला सांगितले. नवरदेवानेही होकार दिल्यामुळे नवरीसह तिचे नातेवाईक निघून गेले. काही वेळातच मध्यस्थ व्यक्तीही पसार झाला. खूप वेळ वाट पाहिल्यानंतरही नवरीला घेऊन तिचे नातेवाईकही आले नाहीत. कोणाचा संपर्क क्रमांक नसल्याने आता काय करावे, या विवंचनेत नवरदेव पडला. आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच, नवरदेवाने सोमवारी दुपारी कोतवाली पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली; परंतु घटनास्थळ हे बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने, पोलिसांनी बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यामुळे नवरदेवाने बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.बनावट लग्न लावून फसवणूक करणारी टोळी सक्रीयलग्नासाठी इच्छुक असलेल्या परप्रांतीय युवकांना हेरून त्यांना मुली दाखवण्यात येतात आणि त्या मुलींचा वापर करून बनावट लग्न लावून युवकांकडून लाखो रुपये उकळले जातात. नंतर काहीतरी कारण सांगून मुलीसह तिचे सहकारीसुद्धा पैसे घेऊन गायब होतात. यापूर्वी अकोल्यात असे प्रकार अनेकदा घडले आहेत. या घटनांवरून अकोल्यात बनावट लग्न लावून फसवणूक करणारी एक टोळीच सक्रिय आहे.

टॅग्स :marriageलग्न