शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

‘कांगारू मदर युनिट’ ठरतेय बालकांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 02:00 IST

अकोला : कमी दिवसांची, कमी वजनाची व गुंतागुंतीच्या प्रसूतीतून जन्मलेल्या बालकांचे प्राण वाचविण्यासाठी येथील जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात अलीकडेच ‘कांगारू मदर केअर युनिट’ (केएमसी) सुरू करण्यात आले असून, हा कक्ष स्थापन झाल्यापासून अर्भक मृत्यूदर नियंत्रित होण्यास मदत मिळाली आहे.

ठळक मुद्देजिल्हा स्त्री रुग्णालयअर्भक मृत्यू दरावर नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कमी दिवसांची, कमी वजनाची व गुंतागुंतीच्या प्रसूतीतून जन्मलेल्या बालकांचे प्राण वाचविण्यासाठी येथील जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात अलीकडेच ‘कांगारू मदर केअर युनिट’ (केएमसी) सुरू करण्यात आले असून, हा कक्ष स्थापन झाल्यापासून अर्भक मृत्यूदर नियंत्रित होण्यास मदत मिळाली आहे.अर्भकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या आहेत. जन्माच्या वेळची परिस्थिती आणि इतर कारणांमुळे नवजात बालकांच्या जीवाला होणारा धोका टळावा, बाळ आणि बाळंतिणीला गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देता यावी, यासाठी राज्यातील सर्वच जिल्हा स्त्री रुग्णालयांमध्ये ‘कांगारू मदर केअर युनिट’ सुरू करण्यात आले असून, याचाच एक भाग म्हणून येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात कांगारू मदर केअर युनिटची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी विशेष कक्ष उघडण्यात आला असून, त्यामध्ये आराम (रिक्लायनिंग) खुच्र्यांची तसेच खाटांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी  एकांत आणि सुरक्षितता याची विशेष काळजी घेण्यात आली असून, कक्षातील कार्यप्रणालीसाठी नियमावलीही (प्रोटोकॉल) बनविण्यात आली आहे. या विशेष कक्षात कार्यरत सर्वच कर्मचार्‍यांना केएमसीचे प्रशिक्षण देण्यात आले असून, या कक्षात २४ तास सेवा आणि बालकांकडे लक्ष देण्यासोबतच मातांना समुपदेशन करून त्यांना आधार आणि मार्गदर्शन करण्याचीही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

काय आहे ‘केएमसी’?    कांगारू मदर केअर युनिट ही कमी खर्चिक आणि जास्त फायद्याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे. यामध्ये कमी वजनाच्या बालकांचे योग्यप्रकारे संगोपन करून त्यांना लागणारी सर्व काळजी घेतानाच मातेकडून परिपूर्ण स्तनपानही दिले जाते. यामुळे जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त प्रमाणात कमी वजनाच्या म्हणजेच दोन हजार ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या बालकांचे मृत्यू टाळण्यास मदत होते. या युनिटमुळे बाळाचे तापमान स्थिर राहते, बाळाला स्तनपानासाठी प्रोत्साहन मिळते आणि विशेष म्हणजे जंतुसंसर्गापासून त्याचा बचाव होतो. बालकाची प्रकृती लवकरात लवकर स्थिर होऊन बालकाची मानसिक वाढही होते. १८00 ग्रॅमपेक्षा जास्त आणि २५00 ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या व प्रकृती स्थिर असणार्‍या बालकांना जन्मानंतर लगेच केएमसी देणे योग्य ठरते. १२00 ग्रॅमपेक्षा जास्त आणि १८00 ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या बालकांना सुरुवातीच्या काळात काही समस्या असतात. त्यांना केएमसी देण्यापूर्वी एसएनसीयूमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जातात. 

कमी वजनाच्या, कमी दिवसांच्या किंवा जंतुसंसर्ग झालेल्या नवजात शिशूंसाठी ‘केएमसी’ एक वरदानच ठरले आहे. युनिटमुळे बाळाचे तापमान स्थिर राहते, बाळाला स्तनपानासाठी प्रोत्साहन मिळते आणि जंतुसंसर्गापासून त्याचा बचाव होतो. - डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.