शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

बोंडअळीने आक्रमण केल्याने १४ एकरातील पऱ्हाटी कापली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 10:57 IST

कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळी आल्याने उत्पादनच मिळत नसल्याचे चित्र आहे.

- विठ्ठल बोळे लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरगाव (अकोला): परतीच्या पावसाने आधीच खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केले. त्यामुळे हजारो रुपयांचा खर्च लावलेल्या कपाशीतून केवळ ३५३ किलोच उत्पादन झाल्याने डोंगरगाव येथील तीन शेतकऱ्यांनी १४ एकरातील पºहाटी कापून टाकली आहे.डोंगरगाव येथील शेतकरी रमेश नारायण देवकर आणि गणेश देवकर यांनी नऊ एकर शेतामध्ये कपाशी पिकाची लागवड केली होती. पीक चांगले होते; मात्र ऐन बोंड्या लागण्याच्या काळात संततधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सततच्या पावसाने बोंड्या काळ्या पडल्या तर फुले आणि पाती गळून पडली. तरीही कपाशी पिकाला लागलेला खर्च निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. या आशेवर त्यांनी वेचणी केली असता नऊ एकर शेतामध्ये केवळ १ क्विंटल ५० किलो कापूस आला. पहिल्या वेचणीनंतर २० ते २५ दिवसांनीही कपाशी फुटली नाही. त्यामुळे त्यांनी शेतामध्ये पाहणी केली असता बोंडअळीने मोठ्या प्रमाणात आक्रमण केल्याचे आढळले. त्यांना ९ एकरात केवळ आतापर्यंत १५० किलो कापसाचे उत्पादन झाले. यामध्ये वेचणीसाठी ९ मजूर लागले. त्यांची मजुरी १ हजार ८०० रुपये झाले. कापसाचा दर्जा चांगला नसल्याने केवळ ३५०० रुपयांचा मिळाला. त्यामुळे आतापर्यंत लागलेला खर्चही निघाला नसल्याने हताश झालेल्या शेतकºयांनी ९ एकरातील पºहाटी कापून टाकली.हीच परिस्थितील संतोष रूपसिंग राठोड यांच्यावर आली. त्यांनी बाळासाहेब देशमुख यांची पाच एकर शेती पाच एकर पन्नास हजार रुपये देऊन केली. त्यामध्ये त्यांनी कपाशीची लागवड केली. पेरणीपासून तर आतापर्यंत कपाशीची मशागत, फवारणीसाठी हजारो रुपयांचा खर्च केला. कापसाची पहिली वेचणी केली असता, त्यांना केवळ २१३ किलो कापूस झाला. त्यानंतर कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळी आल्याने उत्पादनच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांनी हताश होऊन आपल्या पाच एकरातील पºहाटी कापून टाकली. ५० हजार रुपये देऊन त्यांनी शेती केली होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी