शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

‘लॉकडाऊन’च्या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भागविली रक्ताची उणिव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:26 IST

रक्ताचा तुटवडा जाणवणार होता; मात्र ही उणिव प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी रक्तदान करून भरून काढली.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २५ मार्चपासून संपूर्ण जिल्हा ३ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ करण्यात आला. यासह संचारबंदी लागू झाल्याने गर्दी टाळण्यास्तव ३९ दिवस खासगीत होणारी रक्तदान शिबिरे रद्द करण्यात आली. यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवणार होता; मात्र ही उणिव प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी रक्तदान करून भरून काढली. तथापि, उपलब्ध रक्तसाठा ३० एप्रिलपर्यंत पुरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अपघातग्रस्त रुग्ण आणि गर्भवती महिलांना प्रामुख्याने रक्ताची गरज भासते; मात्र संचारबंदी व ‘लॉकडाऊन’च्या काळात रक्तदान शिबिरे आयोजित केल्यास नियमाचा भंग होऊन परिस्थिती बिघडू शकते, ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरावरील प्रशासकीय कार्यालयांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करून अधिकारी, कर्मचाºयांना रक्तदान करायला लावावे, असा निर्णय घेतला. त्याची २६ मार्चपासून ३० मार्चपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली. त्यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालयासह सहाही तहसील कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचाºयांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यामाध्यमातून विविध रक्त गटाच्या २१२ रक्त पिशव्या गोळा झाल्या. एवढे रक्त एप्रिल महिन्याअखेर पुरणार असल्याने काही शिबिरे त्यावेळी रद्द करून २५ एप्रिलनंतर घेण्याचे ठरविण्यात आले. तथापि, अधिकारी आणि कर्मचाºयांच्या पुढाकारामुळे ‘लॉकडाऊन’च्या काळातही रक्ताची उणिव भासली नसल्याने या उपक्रमाप्रती नागरिकांमधून शासनाचे कौतुक होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात गत काही दिवसांपासून शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे ब्लड बँकेत रक्त साठा उपलब्ध आहे; असे असले तरी ‘निगेटिव्ह’ रक्त गटाची उणिव भासत आहे. त्यामुळे पुन्हा एकवेळ प्रशासकीय पातळीवर रक्तदान शिबिरांचे नियोजन करण्याची बाब विचाराधिन आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीwashimवाशिम