शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’च्या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भागविली रक्ताची उणिव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:26 IST

रक्ताचा तुटवडा जाणवणार होता; मात्र ही उणिव प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी रक्तदान करून भरून काढली.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २५ मार्चपासून संपूर्ण जिल्हा ३ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ करण्यात आला. यासह संचारबंदी लागू झाल्याने गर्दी टाळण्यास्तव ३९ दिवस खासगीत होणारी रक्तदान शिबिरे रद्द करण्यात आली. यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवणार होता; मात्र ही उणिव प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी रक्तदान करून भरून काढली. तथापि, उपलब्ध रक्तसाठा ३० एप्रिलपर्यंत पुरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अपघातग्रस्त रुग्ण आणि गर्भवती महिलांना प्रामुख्याने रक्ताची गरज भासते; मात्र संचारबंदी व ‘लॉकडाऊन’च्या काळात रक्तदान शिबिरे आयोजित केल्यास नियमाचा भंग होऊन परिस्थिती बिघडू शकते, ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरावरील प्रशासकीय कार्यालयांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करून अधिकारी, कर्मचाºयांना रक्तदान करायला लावावे, असा निर्णय घेतला. त्याची २६ मार्चपासून ३० मार्चपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली. त्यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालयासह सहाही तहसील कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचाºयांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यामाध्यमातून विविध रक्त गटाच्या २१२ रक्त पिशव्या गोळा झाल्या. एवढे रक्त एप्रिल महिन्याअखेर पुरणार असल्याने काही शिबिरे त्यावेळी रद्द करून २५ एप्रिलनंतर घेण्याचे ठरविण्यात आले. तथापि, अधिकारी आणि कर्मचाºयांच्या पुढाकारामुळे ‘लॉकडाऊन’च्या काळातही रक्ताची उणिव भासली नसल्याने या उपक्रमाप्रती नागरिकांमधून शासनाचे कौतुक होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात गत काही दिवसांपासून शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे ब्लड बँकेत रक्त साठा उपलब्ध आहे; असे असले तरी ‘निगेटिव्ह’ रक्त गटाची उणिव भासत आहे. त्यामुळे पुन्हा एकवेळ प्रशासकीय पातळीवर रक्तदान शिबिरांचे नियोजन करण्याची बाब विचाराधिन आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीwashimवाशिम