शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

भाजपा सरकार मुस्लिमविरोधी असल्याचा काँग्रेसचा गैरसमज - जमाल सिद्धीकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 13:05 IST

भाजप सरकार मुस्लिम विरोधी असल्याची काँग्रेसने गैरसमजूत केली आहे. सरकारचे धोरण सर्व समाजाच्या उत्थानासाठी आहे, हे आता मुस्लिमांना देखिल समजत आहे.

-संजय खांडेकर

अकोला : भाजप सरकार मुस्लिम विरोधी असल्याची काँग्रेसने गैरसमजूत केली आहे. सरकारचे धोरण सर्व समाजाच्या उत्थानासाठी आहे, हे आता मुस्लिमांना देखिल समजत आहे. मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेचे विष पसरवून त्यांच्या वोट बँकेचा सत्तेसाठी वापर केला आहे.असे मत राज्य हज कमेटीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमासाठी ते नुकताच अकोल्यात येऊन गेले,  तेंव्हा लोकमने  त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद.

प्रश्न : मुस्लिमांच्या सर्वांगी विकासासाठी बसविण्यात आलेल्या सच्चर कमेटीच्या अंमलबजावणीसाठी भाजप पुढाकार घेत नाही का?

उत्तर : सच्चर कमेटी आणि त्यातील सुधारणा ह्या काँग्रेसच्याच आहे. काँग्रेसनेच अन्याय केला अन काँग्रेसनेच कमेटी नेमली. मुस्लिमांची दिशाभूल करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. पंडित दिनदयाल अंत्योदय योजना ही संपूर्ण पथदलितांच्या विकासासाठी अंमलात आणली जात आहे. मुस्लिम समाज अज्ञानी आणि गरीब असल्याने त्यांना या योजनेचा लाभ होत आहे. त्यासाठी काँग्रेसच्या सच्चर सारख्या रिपोर्टकार्डची आवश्यकता नाही.

प्रश्न : ट्रीपल तलाकप्रकरणी धोरणास अनेक मुस्लिम संघटनांचा विरोध आहे, तुमचे मत काय?

उत्तर : ट्रीपल तलाकप्रकरणी सरकारचे आणि सुधारणावादी मुस्लिमांचे धोरण शुध्द आणि स्पष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. त्यामुळे मुस्लिम भगिणींवर होणारा अन्याय दूर होण्यास मदत होईल. काही संघटना त्या धोरणास  विरोध करीत आहे, ते चुकीचे आहे.

प्रश्न : काश्मीरप्रकरणी भादंवि ३७० कलम रद्द झाल्यास कुणाला लाभ मिळेल?

उत्तर : भारत सेक्युलर राष्ट्र आहे. तर दुसरीकडे काश्मीरमध्ये कायदा गोठविला गेला आहे. जर भादंवि ३७० कलम रद्द करण्यात आले तर भारतीयांना त्याचा लाभ होईल. देशभरातील मुस्लिमांनाच नव्हे तर कुणालाही काश्मीरमध्ये जमीन-‘घर  घेऊन व्यापार करता येईल. भाजपच्या कार्यकाळात हे कलम रद्द होईल यात शंका नाही.

प्रश्न : लोकसंख्या नियंत्रणासाठी तीन अपत्यांवर असलेल्यांचे अधिकार गोठविण्याचे विधेयक येत आहे, त्याला तुमची संमती आहे का?

उत्तर : जास्त अपत्यांचा मुद्दा मुस्लिमांच्या अज्ञानाशी जुळलेला आहे. सुशिक्षीत मुस्लिम कधीच त्याचे समर्थन करणार नाही. लोकसंख्या नियंत्रणासाठी असे विधेयक येत असेल तर ते केवळ मुस्लिमांसाठी  नाही तर सर्व भारतीयांसाठी  स्वागतार्ह ठरेल. त्यामुळे मुस्लिमांचा विकास दर उंचावेल. मुस्लिमांमधील असुरक्षीततेची भावना भाजप कमी करण्याचे प्रयत्न करीत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाBJPभाजपाcongressकाँग्रेसinterviewमुलाखत