बिजोत्पादन कार्यक्रमावर होणार साडेआठ लाख खर्च !
By Admin | Updated: January 2, 2015 00:31 IST2015-01-02T00:31:41+5:302015-01-02T00:31:41+5:30
विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयातून सुरूवात.

बिजोत्पादन कार्यक्रमावर होणार साडेआठ लाख खर्च !
अकोला: शेतकर्यांनी स्वत: दज्रेदार बियाणे निमिर्ती करण्यासाठी बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत असून, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत या प्रशिक्षणाकरीता ८.६0 लाख रू पये खर्च केले जाणार आहेत. सुरू वातीला हा कार्यक्रम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयात राबविण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या विदर्भस्तरीय बिजोत्पादन कार्यक्रमाला सुरू वात केली असून,यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत या विद्यापीठाला १४.३५ लाखाचा प्रकल्प मिळाला आहे. यातील ८.६0 लाख रू पये बीजोत्पादन प्रशिक्षणावर खर्च केले जाणार आहेत. सुरू वातीच्या टप्प्यात अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयात हा कार्यक्रम राबविला जात आहे. अमरावती जिल्हयातील अचलपूर येथून या प्रशिक्षणाची सुरू वात करण्यात आली आहे. येथे तीन दिवस ५१ शेतकर्यांना बिजोत्पादनाची शास्त्रोक्त माहिती देण्यात आली. येणारी तीन वर्ष चालणार्या या कार्यक्रमात खरीप व रब्बी हंगामातील कापूस, तूर, मिरची, टोमॅटो आदी भाजीपाला, फळ पिके तसेच सोयाबीन आणि ज्वारी या पिकांच्या बिजोत्पादनाची माहिती शेतकर्यांना देण्यात येत आहे. यात बीजप्रमाणी करणाची न्यूनतम मापके, उगवणशक्ती तपासणे, शुध्द बियाणे विलगीकरण, बियाण्यातील भेसळ ओळखण्यासाठीचे विषेश प्रशिक्षण शेतकर्यांना देण्यात येत आहे.तसेच पेरणी आणि क्षेत्राची निवड, पेरणी पध्दत,बियाण्यातील भेसळ काढण्याची पध्दत, यावर या प्रशिक्षणात भर देण्यात असून, पीक काढणी आणि मळणीच्यावेळी होणारे नुकसान कसे टाळायचे यासाठी कृषी विद्यापीठाचे विविध विषयाचे विषयतज्ञ शेतकर्यांना मार्गदर्शन करीत आहेत. कृषी माल शेतातून काढल्यानंतर साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. या मुळ विषयाचे ज्ञान शेतकर्यांना देण्यात येत आहे. स्वत: बियाणे तयार करण्यासाठीची काळजी आणि १९६६ बियाणे कायदाही शेतकर्यांना समजावून सांगितला जात आहे. शुध्द बियाणे कूठुन व कसे मिळवावे,प्रतवारी व दर्जा कसा ठरवावा,आदीसंदर्भात माहिती शेतकर्यांना देण्यात येत आहे. दज्रेदार बिजोत्पादन निर्मीतीसाठी विदर्भातील शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून,तीन वर्ष हा कार्यक्रम राबविला जाणार असल्याचे डॉ.पंदेकृविचे संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी सांगीतले.