शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

सोयाबीन चोरणारी मोठी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:16 AM

९० हजार रुपयांचे सोयाबीने चोरल्याचे जवळपास मान्य केले आहे.

अकोला : बार्शीटाकळी रोडवरील एका शेतामधून ९० हजारांचे सोयाबीन चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या एका टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. या टोळीमध्ये चार जणांचा समावेश असून, यामधील दोन चोरटे बाप-लेक असल्याचे समोर आले आहे. या चोरट्यांना मंगळवारी किंवा बुधवारी न्यायालयसमोर हजर करण्यात येणार आहे.बार्शीटाकळी रोडवरील सतीश भाऊराव आखरे यांच्या शेतातील सोयाबीन आॅक्टोबर २०१९ मध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केले होते. या प्रकरणी आखरे यांनी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व त्यांच्या पथकाने या टोळीवर पाळत ठेवून नायगाव येथील रहिवासी शेख रफीक शेख बशीर त्याचा मुलगा शेख फारुख, शेख जफर शेख हुसेन आणि शेख निसार शेख नजीर या चार आरोपींना अटक केली. चारही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात येत असून, त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पीक अशाच प्रकारे चोरी केल्याची माहिती समोर येत आहे; मात्र या चार चोरट्यांनी आखरे यांचे सुमारे ९० हजार रुपयांचे सोयाबीने चोरल्याचे जवळपास मान्य केले आहे. त्यामुळे या टोळीकडून शेतकºयांचे पीक चोरी केल्याच्या आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी