शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

लेकुरवाळी पुन्हा रुळावर, भुसावळ-वर्धा पॅसेंजर १६ सप्टेंबरपासून धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 16:25 IST

पहिल्या लॉकडाऊन काळात बंद झालेली पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

अतुल जैस्वाल

अकोला : सामान्य प्रवाशांची लेकुरवाळी अशी ओळख असलेली भुसावळ-वर्धा-भुसावळ ही पॅसेंजर गाडी १६ सप्टेंबर २०२२ पासून पुन्हा एकदा धावणार असून, अकोल्यासह इतर छोट्या स्थानकांवर या गाडीला थांबा राहणार असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पहिल्या लॉकडाऊन काळात बंद झालेली पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. १११२१ भुसावळ-वर्धा पॅसेंजर ही १६ सप्टेंबर २०२२ पासून भुसावळ स्थानकावरून दररोजी दुपारी २.३० वाजता रवाना होऊन रात्री ९ वाजता वर्धा स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी दररोज सायंकाळी ५.३० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्र. १११२२ वर्धा-भुसावळ पॅसेंजर ही गाडी १७ सप्टेंबर २०२२ पासून वर्धा स्थानकावरून दररोज रात्री १२.०५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२५ वाजता भुसावळ स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी दररोज पहाटे ४.०० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. या गाडीला दहा जनरल व दोन एसएलआर असे एकूण १२ डबे असणार आहेत.

जिल्ह्यात या स्थानकांवर थांबा

अप व डाऊन दोन्ही बाजूच्या पॅसेंजर गाड्या अकोला व मूर्तिजापूर या मोठ्या रेल्वे स्थानकांसोबतच जिल्ह्यातील गायगाव, पारस, बोरगाव, काटेपूर्णा, मूर्तिजापूर, माना, कुरुम या लहान स्थानकांवरही थांबणार आहेत. अकोला स्थानकावर पाच मिनिटे, मूर्तिजापूर स्थानकावर दोन मिनिटे, तर इतर स्थानकांवर एक मिनीटचा थांबा असणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळwardha-acवर्धा