शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अकोल्यात शेतकर्‍यांसाठी ‘भारिप’चा ‘आक्रोश; जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला धडक मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:43 IST

शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर विविध मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघ अकोला जिल्हा शाखेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘शेतकरी आक्रोश’ धडक मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले.

ठळक मुद्देसरकारला धडा शिकवा; धोरणाचा नोंदविला निषेध!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर विविध मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघ अकोला जिल्हा शाखेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘शेतकरी आक्रोश’ धडक मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले.सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, कृषी पंपांना अखंड १२ तास वीज पुरवठा करण्यात यावा व शेतकर्‍यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, सोयाबीनला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये, तुरीला सात हजार रुपये, कापसाला नऊ हजार रुपये भाव देण्यात यावा व शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्यात यावा, अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, शेतमालाची ऑनलाइन विक्री बंद करण्यात यावी, ‘क्रीमी लेयर’मधून ओबीसीमधील काही जाती वगळण्याची करण्यात आलेली शिफारस रद्द करण्यात यावी, जिल्हय़ातील खड्डेमय रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावे, पाणीटंचाई निवारणासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्या, यासह इतर मागण्यांसाठी भारिप-बमसंच्यावतीने ‘शेतकरी आक्रोश’ मोर्चा काढण्यात आला. शहरातील टॉवरस्थित भारिप-बमसं कार्यालयापासून काढण्यात आलेला मोर्चा टॉवर चौक, बसस्थानक चौक, गांधी चौक मार्गे पंचायत समितीसमोरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. पक्षनेत्यांच्या एका शिष्टमंडळामार्फत विविध मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांना देण्यात आले. या मोर्चात भारिप-बमसं जिल्हाध्यक्ष तथा आमदार बळीराम सिरस्कार, जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, माजी आमदार हरिदास भदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, डी.एन. खंडारे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, जमीरउल्लाखा पठाण, गजानन गवई, अशोक शिरसाट, आसिफ खान, राजुमिया देशमुख, अँड. धनश्री देव, किरण बोराखडे, बबलू जगताप, डॉ. प्रसन्नजित गवई, प्रा. शैलेश सोनोने, बालमुकुंद भिरड, सरला मेश्राम,रेखा अंभोरे, देवका पातोंड, अरुंधती शिरसाट, सम्राट सुरवाडे, सुभाष रौंदळे, बुद्धरत्न इंगोले, पराग गवई, प्रदीप वानखडे, दामोदर जगताप, अँड. संतोष राहाटे, रणजित वाघ, विकास सदांशिव, अमोल शिरसाट, सचिन शिराळे, मनोरमा गवई, राहुल अहिरे, शेख साबीर, रवी पाटील, मिलिंद वाकोडे, विशाल पाखरे, मनोहर पंजवाणी, संगीता खंडारे, पार्वती लहाने, विद्या अंभोरे, प्रा. मंतोष मोहोळ, प्रभा शिरसाट, कोकिळा वाहुरवाघ, सिद्धार्थ शिरसाट यांच्यासह भारिप-बमसंचे जिल्हय़ातील पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सरकारला धडा शिकवा; धोरणाचा नोंदविला निषेध!केंद्र व राज्यातील सरकारने जनतेला अनेक आश्‍वासनांची खैरात वाटली तसेच शेतकर्‍यांना विकासाची स्वप्ने दाखविली; मात्र तीन वर्षे उलटूनही सरकारने काहीच केले नसल्याने, शेतकर्‍यांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे, असा आरोप करीत सरकारला धडा शिकविल्याशिवाय आता पर्याय नाही, असे आवाहन आ. बळीराम सिरस्कार, काशीराम साबळे, डी.एन. खंडारे, प्रतिभा अवचार, संध्या वाघोडे, शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे यांच्यासह इतर नेत्यांनी मोर्चाला संबोधित करताना केले. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेधही यावेळी करण्यात आला.

टॅग्स :Bharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघagitationआंदोलनAkola cityअकोला शहर