शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

लाभार्थींच्या अन्न सुरक्षा दिनाचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 15:31 IST

अकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी दरमहा ७ तारखेला प्रत्येक दुकानात धान्य उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा जिल्ह्यातील शेकडो दुकानांमध्ये आॅक्टोबर महिन्यात फज्जा उडाला आहे.

अकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी दरमहा ७ तारखेला प्रत्येक दुकानात धान्य उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा जिल्ह्यातील शेकडो दुकानांमध्ये आॅक्टोबर महिन्यात फज्जा उडाला आहे. ठरलेल्या तारखेला दुकानांत धान्यच पोहोचले नसल्याने लाभार्थींना वेळेत वाटप झाले नाही. या प्रकारामुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाबाहेर ही बाब गेल्याचे स्पष्ट होत आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून लाभार्थींना धान्य वाटपासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू करण्यात आला. त्या कायद्यानुसार लाभार्थींना ठरलेले प्रमाण आणि वेळेतच धान्याचा पुरवठा करण्याचा उपक्रमही सुरू झाला. त्यासाठी शासनाने गोदामातून धान्य उचल करणे, दुकानदारांना धान्य वाटप करण्यासाठी पासिंगचा कालावधी, चलानद्वारे धान्याची रक्कम बँकेत भरणे, द्वारपोच योजनेतून धान्य दुकानांत पोहोचविणे, या सर्व प्रक्रियांसाठी महिन्यातील दिवस ठरवून दिले आहेत. त्या वेळापत्रकानुसार पुरवठा विभागाने प्रक्रिया केल्यास प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला जिल्ह्यातील सर्वच दुकानांमध्ये धान्य उपलब्ध होऊ शकते. ती पुरवठा विभागाची जबाबदारी आहे; मात्र गेल्या काही महिन्यांत पुरवठा विभागाच्या यंत्रणेकडून त्याकडे कमालीचे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातून अन्न सुरक्षा कायद्यानुसार ठरलेल्या अन्न सुरक्षा दिनाचा फज्जा उडविला जात आहे. त्यातच दुकानांत धान्य उशिरा पोहोचल्याने लाभार्थी येऊन परत जातात. त्यातून त्यांच्या हिश्श्याच्या धान्याचा काळाबाजार करण्यास प्रोत्साहन देण्याचाही प्रकार घडत आहे. चालू महिन्यातील नियोजनानुसार दरदिवशी धान्य वाटपाचे प्रमाण पाहता तहसील स्तरावरील यंत्रणा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकाºयांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे स्पष्ट होत आहे.- अकोला, मूर्तिजापुरातील लाभार्थी प्रतीक्षेत!अन्न सुरक्षा दिवसाचा फज्जा अकोला शहर, ग्रामीण आणि मूर्तिजापूर तालुक्यात उडाला आहे. ८ आॅक्टोबरपर्यंत अकोला शहरातील १२४ पैकी धान्य पासिंग झालेल्या ८१ पैकी ७९ दुकानात धान्य पोहोचले. अकोला ग्रामीणमध्ये १७३ पैकी १३७ दुकानांच्या धान्याचे परमिट पासिंग झाले. त्यातील ११९ दुकानांतच धान्य पोहोचले. धान्य वाटपाचे हे प्रमाण पाहता शहर आणि ग्रामीणमध्ये अनुक्रमे ३७ व ३२ टक्के दुकानांत धान्यच पोहोचले नसल्याचे स्पष्ट होत आहे. हा प्रकार मूर्तिजापूर तालुक्यातही घडला आहे.- जिल्ह्यातील हमालांवर उपासमारीची वेळतहसीलच्या शासकीय गोदामात धान्याची चढ-उतार, प्रमाणीकरण करणाºया हमालांना गेल्या आॅगस्टपासून मजुरीही मिळाली नाही. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात चकरा मारल्या; मात्र काहीच उपयोग झाला नाही. मजुरी नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.गोदामातील हमाल कामगारांनी मजुरीच्या समस्येसंदर्भात काहीही सांगितले नाही. इंडेंट पासिंग झालेल्या दुकानदारांना धान्य वाटप झाले आहे. पासिंगनंतरही धान्य न मिळालेल्या दुकानांची माहिती दिल्यास दुकानदारांना त्याबाबत विचारणा केली जाईल.- राजेश खवले, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना