शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मदतीच्या रकमेतून बँकांना करता येणार नाही वसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 11:54 IST

मदतीच्या रकमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असा आदेश १८ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयात देण्यात आला आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या शासनामार्फत २ हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. पीक नुकसान भरपाईच्या मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून, मदतीच्या रकमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असा आदेश १८ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयात देण्यात आला आहे. त्यानुसार शेतकºयांच्या मदतीच्या रकमेतून बँकांना कोणत्याही प्रकारची वसुली करता येणार नाही.पावसाळा संपल्यानंतर गेल्या महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामध्ये खरीप पिकांसह बागायती आणि फळपिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. हाता-तोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसाने पळविल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने गत १८ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार शेतकºयांसाठी पीक नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईची हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईची हेक्टरी १८ हजार रुपये मदत शेतकºयांना देण्यात येणार आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी पहिल्या टप्प्यात २ हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. मदतीची रक्कम बाधित शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करून मदतीच्या रकमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, त्यासाठी सहकार विभागाने आदेश निर्गमित करण्याचा आदेशही शासन निर्णयात देण्यात आला आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाईपोटी शेतकºयांच्या खात्यात जमा होणाºया मदतीच्या रकमेतून बँकांना कोणत्याही प्रकारची वसुली करता येणार नाही.

पहिल्या टप्प्यात वितरित अशी आहे मदतीची रक्कम!राज्यात ३४ जिल्ह्यातील शेतकºयांसाठी पहिल्या टप्प्यात २ हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपये मदतीची रक्कम शासनामार्फत वितरित करण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावती विभागात अकोला जिल्हा-७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपये, वाशिम जिल्हा -५६ कोटी ५१ लाख २० हजार रुपये, अमरावती जिल्हा -७२ कोटी ४० लाख ९३ हजार रुपये व यवतमाळ जिल्ह्यासाठी १०१ कोटी ९६ लाख ३३ हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीbankबँक