शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

मदतीच्या रकमेतून बँकांना करता येणार नाही वसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 11:54 IST

मदतीच्या रकमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असा आदेश १८ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयात देण्यात आला आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या शासनामार्फत २ हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. पीक नुकसान भरपाईच्या मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून, मदतीच्या रकमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असा आदेश १८ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयात देण्यात आला आहे. त्यानुसार शेतकºयांच्या मदतीच्या रकमेतून बँकांना कोणत्याही प्रकारची वसुली करता येणार नाही.पावसाळा संपल्यानंतर गेल्या महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामध्ये खरीप पिकांसह बागायती आणि फळपिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. हाता-तोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसाने पळविल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने गत १८ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार शेतकºयांसाठी पीक नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईची हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईची हेक्टरी १८ हजार रुपये मदत शेतकºयांना देण्यात येणार आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी पहिल्या टप्प्यात २ हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. मदतीची रक्कम बाधित शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करून मदतीच्या रकमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, त्यासाठी सहकार विभागाने आदेश निर्गमित करण्याचा आदेशही शासन निर्णयात देण्यात आला आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाईपोटी शेतकºयांच्या खात्यात जमा होणाºया मदतीच्या रकमेतून बँकांना कोणत्याही प्रकारची वसुली करता येणार नाही.

पहिल्या टप्प्यात वितरित अशी आहे मदतीची रक्कम!राज्यात ३४ जिल्ह्यातील शेतकºयांसाठी पहिल्या टप्प्यात २ हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपये मदतीची रक्कम शासनामार्फत वितरित करण्यात आली आहे. त्यामध्ये अमरावती विभागात अकोला जिल्हा-७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपये, वाशिम जिल्हा -५६ कोटी ५१ लाख २० हजार रुपये, अमरावती जिल्हा -७२ कोटी ४० लाख ९३ हजार रुपये व यवतमाळ जिल्ह्यासाठी १०१ कोटी ९६ लाख ३३ हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीbankबँक