घरकुलासाठी लाभार्थी बनले कर्जबाजारी !
By Admin | Updated: May 16, 2014 21:42 IST2014-05-16T18:49:55+5:302014-05-16T21:42:23+5:30
ग्रामीण भागात गवंडीकामाचे भाव वाढल्याने कमी पैशात घरकुल बांधून देणारे मिळेनासे झाले आहेत.

घरकुलासाठी लाभार्थी बनले कर्जबाजारी !
करतखेडा (अकोला):निराधार व दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या घरकुलाचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी शासनाने इंदिरा आवास योजना अंमलात आणली आहे. परंतु आता घरकुलाचे स्वप्न साकार होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाहीत. ग्रामीण भागात गवंडीकामाचे भाव वाढल्याने कमी पैशात घरकुल बांधून देणारे मिळेनासे झाले आहेत. इंदिरा आवास योजनेंतर्गत ग्रामपंचायतने ३२ घरकुलांना मंजुरात दिली आहे. दारिद्र्यरेषेखालील लोकांना दोन टप्प्यात ७० हजार रुपये मिळालेत. २५ हजारांचा तिसरा टप्पा बाकी आहे. घरकुलाचे बांधकाम सुरू आहेत; परंतु दोन खोल्याचे बांधकाम करण्यासाठी गवंडी ५५ ते ६५ हजार रुपये मागत आहेत. गरीब लोकांना घरकुलाच्या बांधकामाचे मोजमाप न समजल्याने लाभार्थी संकटात सापडले आहेत. अर्धवट काम राहील, या भीतीने लाभार्थी हातउसणे करू न पैसा उभा करीत आहेत. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ लाभार्थींवर आली आहे. ग्रामीण भागात बहुतांश गावामध्ये हीच स्थिती आहे. घरकुलासाठी मिळणारी रक्कम वाढवून दिल्यास लाभार्थींना या योजनेला लाभ घेता येईल. पैसा नसल्यामुळे अनेकांचे काम अर्धवट स्थितीत अडकले आहे. घरकुलाच्या कामासाठी उसणे दिलेले पैसे लाभार्थी परत करणार नाही, अशी भीती असल्यामुळे कोणीही पैसे देण्यास धजावत नाही. इंदिरा आवास योजनेचा खर्या अर्थाने लाभ गरिबांच्या पदरात पडत नाही, हे सत्य आहे. काही गावांमध्ये श्रीमंती लोकांनाही घरकुल मंजूर झालीत. त्यांनी शौचालयाचे थातूरमातूर काम करू न अनुदानाचा लाभ घेतला. मात्र खरे लाभार्थी अनेक गावात वंचित आहेत. घरकुल वाटपाच्या यादीत मोठ्या प्रमाणात राजकारण झाल्यामुळे अनेक गावात लाभार्थींना फटका बसला आहे. करतखेडा येथे नियमानुसारच घरकुलाचे वाटप झाल्याचे सांगण्यात आले. या योजनेचा लाभ खर्या लोकांना मिळावा व गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्यासाठी शासनाने जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी, अशी मागणी जोर धरत आहे.