शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बाळापूर : राजकीय समीकरण बदलणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:10 IST

बंडखोरांची उमेदवारी कायम राहिल्यास राजकीय समीकरण बदलणार आहे.

- अनंत वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर: बाळापूर मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांनी स्वपक्षाच्या उमेदवारांविरोधात दंड थोपटून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या बंडखोरांची उमेदवारी कायम राहिल्यास राजकीय समीकरण बदलणार आहे.बाळापूर मतदारसंघ हा परंपरागत भाजप, काँग्रेसचा मानल्या जातो; परंतु यंदा ही जागा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, भाजप-सेना युतीने नितीन देशमुख, काँग्रेस-राकाँ आघाडीचे संग्राम गावंडे यांना उमेदवारी जाहीर केली; परंतु त्यांना बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते आमदार बळीराम सिरस्कार यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांची व समर्थकांची नाराजी आहे. भाजप, काँग्रेसला ही जागा सोडावी लागल्यामुळे भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. वंचित बहुजन आघाडीचे आमदार बळीराम सिरस्कार, प्रा. डॉ. संतोष हुशे, गजानन दांदळे, डॉ. रहेमान खान, अश्वजित सिरसाट यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवार डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांची अडचण वाढविली आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तायडे, माजी जि. प. सदस्य पंढरी हाडोळे, चंद्रशेखर चिंचोळकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून काँग्रेस-राकाँ आघाडीचे उमेदवार संग्राम गावंडे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. यासोबतच माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, शिवसंग्रामचे संदीप पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून युतीला अडचणीत आणले आहे. एवढेच नाही, तर स्वाभिमानी पक्षाकडून उद्योजक तुकाराम दुधे यांनीही अर्ज दाखल केला आहे. या बंडखोरीचा फटका या तीनही उमेदवारांना बसू शकतो. त्यामुळे नाराज इच्छुकांची या उमेदवारांना मनधरणी करून बंडखोरी थोपवून धरण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.दरम्यान, वंबआ, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले तीनही उमेदवार प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, संग्राम गावंडे, नितीन देशमुख हे नवखे आहेत. त्यापैकी नितीन देशमुख गत निवडणुकीचा अनुभव गाठीशी आहे. पुंडकर, गावंडे यांना बाळापूर मतदारसंघाचा अभ्यास असला तरी, त्यांना गावोगावी फिरून जनसंपर्क साधण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. हे सर्व बंडखोर उमेदवार रिंगणात कायम राहतात की माघार घेतात, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :balapur-acबालापूरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019