शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

शरीराचे संतुलित तापमान करेल उष्माघातापासून बचाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 12:52 IST

अकोला: उन्हाचा पारा सध्या आपलेच रेकॉर्ड मोडतो आहे. परिणामी, उष्माघात आणि त्यामुळे मृत्यू होण्याची भीतीही वाढली आहे. यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर शरीराचे तापमान संतुलित राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

अकोला: उन्हाचा पारा सध्या आपलेच रेकॉर्ड मोडतो आहे. परिणामी, उष्माघात आणि त्यामुळे मृत्यू होण्याची भीतीही वाढली आहे. यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर शरीराचे तापमान संतुलित राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.अकोल्यात जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद मागील काही दिवसांपासून केली जात आहे. हीच स्थिती आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वाढत्या तापमानामुळे शरीराचे तापमानदेखील प्रभावित होते. त्यामुळेच चक्कर येणे, उलट्या होणे, उन्हाळी सर्दी, डोकेदुखी, ताप येणे आणि जास्तच प्रभावित झाल्यास उष्माघाताची शक्यताही नाकारता येत नाही. शरीराचे तापमान गरजेपेक्षा जास्त वाढल्यास या प्रकारचे धोके संभावतात. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत उष्माघातापासून बचाव करायचा असेल, तर भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.शरीराचे तापमान हवे ३७ अंश सेल्सिअससाधारणत: मानवी शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअस असते. या तापमानातच शरीरातील सर्व अवयव नीट काम करू शकतात. वातावरणातील तापमान वाढल्यास शरीर घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर काढून शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअस राखते; परंतु सतत घाम निघाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सतत पाणी पित राहणे गरजेचे असते; परंतु अनेकदा असे होत नाही. पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामे करते, त्यामुळे शरीरातील पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणे टाळते. जेव्हा बाहेरचे तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते, त्यावेळी शरीरातील कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प पडते. तेव्हा शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागते.उष्माघातामुळे मृत्यू का होतो?रक्तातील पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होते, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होते, महत्त्वाच्या अवयवांना विशेषत: मेंदूला रक्त पुरवठा थांबतो. त्यामुळे माणूस कोमात जाऊ शकतो. असे करता करता त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढवतो.उन्हाळ्याच्या दिवसांत शक्यतो सुती व पांढऱ्या रंगाचे वस्त्र वापरावे. कोल्ड्रिंकऐवजी लिंबू सरबत, नारळ पाण्याचे सेवन करावे, अशक्तपणा व ताप वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाSun strokeउष्माघातHeat Strokeउष्माघातHealthआरोग्य