शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सिंचन प्रकल्पांचा अनुशेष; वित्त विभाग घेणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 12:52 PM

अकोला: अमरावती विभागातील यवतमाळ जिल्हा वगळता हिंगोलीचा समावेश करून या जिल्ह्यांमध्ये असलेल्या सिंचनाच्या अनुशेषावर निर्णय घेण्यासाठी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

अकोला: अमरावती विभागातील यवतमाळ जिल्हा वगळता हिंगोलीचा समावेश करून या जिल्ह्यांमध्ये असलेल्या सिंचनाच्या अनुशेषावर निर्णय घेण्यासाठी वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांना गती देणे तर अशक्य, प्रकल्पांचा अहवाल मंत्रिमंडळाला सादर करण्याची जबाबदारी समितीला १८ जानेवारी रोजी देण्यात आली आहे.अमरावती विभागातील पाटबंधारे विकास क्षेत्राचा अनुशेष दूर करणे, त्यासाठी वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांची समिती २७ मार्च २०१५ रोजीच गठित करण्यात आली. त्या समितीने आतापर्यंत किती जिल्ह्यातील अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न केले, हे पुढे आलेले नाही. त्याच वेळी समितीकडे हिंगोली जिल्ह्याचीही जबाबदारी देण्यात आली. वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली गठित समितीमध्ये सचिव म्हणून जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यांची जबाबदारी आहे.आता ही समिती अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा यासह हिंगोली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प अनुशेषाचा अभ्यास करणार आहे. त्यामध्ये अपूर्ण असलेले प्रकल्प वेगाने पूर्ण करणे, त्यातील समस्या सोडवणे, जे प्रकल्प भूसंपादन, सुधारित प्रशासकीय मान्यता, पुनर्वसन या कारणांमुळे पूर्ण होऊ शकत नाहीत, त्याबाबत मंत्रिमंडळाला अहवाल सादर करण्याची जबाबदारी समितीवर आहे. पाचही जिल्ह्यातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी समितीने विविध विभाग, यंत्रणांशी समन्वय साधण्याचेही बजावण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पGovernmentसरकार