‘बाबूगिरी’ संपविण्यात आचारसंहितेची आडकाठी!

By Admin | Updated: May 29, 2014 01:13 IST2014-05-29T01:06:51+5:302014-05-29T01:13:32+5:30

बदलीस पात्र कर्मचार्‍यांची फाईलही तयार झाली होती. मात्र, अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने ग्रामविकास मंत्रालयातर्फे या बदल्यांना स्थगिती देण्यात आली.

'Babujiri' ends the code of conduct! | ‘बाबूगिरी’ संपविण्यात आचारसंहितेची आडकाठी!

‘बाबूगिरी’ संपविण्यात आचारसंहितेची आडकाठी!

अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सोयीच्या टेबलांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांची ह्यबाबूगिरीह्ण संपविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी बदलीस पात्र कर्मचार्‍यांची फाईलही तयार झाली होती. मात्र, अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने ग्रामविकास मंत्रालयातर्फे या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. असे असले तरी मुंबईत मंत्रालयामध्ये मात्र बदली प्रक्रिया सुरूच आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचार्‍यांच्या बदलीचे धोरण शासनाने निश्‍चित केले आहे. त्यानुसार दरवर्षी बदलीस पात्र कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात येतात. असे असले तरी काही कर्मचारी त्यातून पळवाट काढीत एकाच टेबलवर वर्षानुवर्षांपासून काम करताना दिसत आहेत. अशा कर्मचार्‍यांपैकी ज्यांना एकाच टेबलवर तीन वर्षे व एका कार्यालयात पाच वर्षे झाली, अशांची बदली करण्याचे धोरण अकोला जिल्हा परिषद प्रशासनाने राबविले होते. त्याला आता ग्रामविकास मंत्रालयाने २२ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार स्थगिती देण्यात आली आहे. शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे कर्मचार्‍यांची बदली करावी किंवा नाही, याबाबत विचारणा झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडे शासनाने पत्र पाठवून मार्गदर्शन मागविले आहे. निवडणूक आयोगाकडून जोपर्यंत कोणतीही सूचना येत नाही, तोपर्यंत बदल्या किंवा बदलीसाठी कर्मचार्‍यांचे समुपदेशन स्थगित ठेवण्यात यावे, असे आदेश शासनाने दिले आहेत.

Web Title: 'Babujiri' ends the code of conduct!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.