शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आता २३१ तालुक्यात पावसाने ओलांडली सरासरी!

By admin | Updated: August 6, 2016 01:46 IST

ऑगस्ट महिन्यातही पाऊस, पण दोन तालुक्यात २५ ते ५0 टक्केच पाऊस.

अकोला, दि. ५: यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात सरासरीच्या १0९ टक्के पाऊस झाला आहे. ३५५ तालुक्यापैकी २३१ तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. १३९.६४ लाख हेक्टरपैकी १३५.0२ लाख हेक्टर म्हणजेच ९७ टक्के पेरण्या आटोपल्या असून, पीकपरिस्थिती सर्वत्र उत्तम आहे; परंतु दोन तालुक्यात २५ ते ५0 तर २६ तालुक्यात केवळ ५0 ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.यावर्षी दमदार सार्वत्रिक पावसामुळे सर्वत्र पिके बहरली आहेत. भात व नाचणी पिकाच्या पुनर्लागवडीची कामे प्रगतिपथावर आहेत. राज्यातील सर्वच विभागात पेरण्या प्रगतिपथावर आहेत. ऑगस्टच्या प्रथम आठवड्यात कोकणात ४७ तालुक्यांपैकी ९ तालुक्यात ७५ ते १00 टक्के, तर ३८ तालुक्यात १00 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला असून, खरिपातील ४.८७ हेक्टरपैकी ३.६९ लाख हेक्टर म्हणजेच ७६ टक्के क्षेत्रावर पेरणी व लागवड झाली आहे. नाशिक विभागातील ४0 तालुक्यांपैकी एका तालुक्यात २५ ते ५0 टक्के, ८ तालुक्यात ५0 ते ७५ टक्के, १८ तालुक्यात ७५ ते १00 टक्के तर १३ तालुक्यात १00 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या विभागात खरिपाच्या २१.५१ लाख हेक्टरपैकी १९.८६ लाख हेक्टर म्हणजेच ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली. पुणे विभागात ३९ तालुक्यापैकी २३ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला आहे. पुणे विभागात खरिपाचे ७.३९ हेक्टर क्षेत्र आहे; पण यावर्षी ९.३६ लाख हेक्टर म्हणजेच १२७ टक्के पेरणी झाली. कोल्हापूर विभागातील ३३ तालुक्यांपैकी २२ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला. या विभागात खरिपाचे ८.0६ लाख हेक्टर क्षेत्र आहे; पण ८.२९ लाख हेक्टर म्हणजेच १0३ टक्के पेरणी झाली आहे. औरंगाबाद विभागातील २८ तालुक्यांपैकी १९ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला आहे. या विभागात खरिपाचे १८.८७ लाख हेक्टर क्षेत्र आहे. तथापि, यावर्षी २0.६९ लाख म्हणजेच ११0 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लातूर विभागातील ४८ तालुक्यापैकी ३८ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला असून, खरिपाच्या २७.२७ लाख हेक्टरपैकी २६.३९ हेक्टर म्हणजेच ९७ टक्के पेरणी झाली आहे. अमरावती विभागातील ५६ तालुक्यापैकी ४७ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला असून, ३२.६८ लाख हेक्टरपैकी ३१.९९ लाख हेक्टर म्हणजेच ९८ टक्के पेरणी आटोपली आहे. नागपूर विभागातील ६४ तालुक्यापैकी ३१ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला आहे. खरिपाच्या १८.९८ लाख हेक्टरपैकी १४.७४ लाख म्हणजेच ७८ टक्के पेरणी झाली आहे. "अमरावती विभागात पावसाने जुलै महिन्यातच सरासरी ओलांडली आहे. पिके उत्तम आहेत. शेतकर्‍यांना आता मशागतीसाठी काही दिवस उघडीप हवी आहे."- एस.आर. सरदार,विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.