शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
3
"पाती माझ्यासोत जबरदस्ती..."; इंग्लंडचे माजी खासदार अँड्रयू ग्रिफिथ्स यांच्यावर, माजी खासदार पत्नीचा गंभीर आरोप
4
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
5
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
6
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
7
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
8
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
9
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
10
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
11
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
12
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
13
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
14
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
15
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
16
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
17
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
18
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
19
७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”
20
"स्मिता तळवलकर नाराज झाल्या आणि मी...", 'लक्ष्मी निवास' फेम तुषार दळवींनी सांगितला 'तो' किस्सा

राज्यात आता २३१ तालुक्यात पावसाने ओलांडली सरासरी!

By admin | Updated: August 6, 2016 01:46 IST

ऑगस्ट महिन्यातही पाऊस, पण दोन तालुक्यात २५ ते ५0 टक्केच पाऊस.

अकोला, दि. ५: यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात सरासरीच्या १0९ टक्के पाऊस झाला आहे. ३५५ तालुक्यापैकी २३१ तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. १३९.६४ लाख हेक्टरपैकी १३५.0२ लाख हेक्टर म्हणजेच ९७ टक्के पेरण्या आटोपल्या असून, पीकपरिस्थिती सर्वत्र उत्तम आहे; परंतु दोन तालुक्यात २५ ते ५0 तर २६ तालुक्यात केवळ ५0 ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.यावर्षी दमदार सार्वत्रिक पावसामुळे सर्वत्र पिके बहरली आहेत. भात व नाचणी पिकाच्या पुनर्लागवडीची कामे प्रगतिपथावर आहेत. राज्यातील सर्वच विभागात पेरण्या प्रगतिपथावर आहेत. ऑगस्टच्या प्रथम आठवड्यात कोकणात ४७ तालुक्यांपैकी ९ तालुक्यात ७५ ते १00 टक्के, तर ३८ तालुक्यात १00 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला असून, खरिपातील ४.८७ हेक्टरपैकी ३.६९ लाख हेक्टर म्हणजेच ७६ टक्के क्षेत्रावर पेरणी व लागवड झाली आहे. नाशिक विभागातील ४0 तालुक्यांपैकी एका तालुक्यात २५ ते ५0 टक्के, ८ तालुक्यात ५0 ते ७५ टक्के, १८ तालुक्यात ७५ ते १00 टक्के तर १३ तालुक्यात १00 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या विभागात खरिपाच्या २१.५१ लाख हेक्टरपैकी १९.८६ लाख हेक्टर म्हणजेच ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली. पुणे विभागात ३९ तालुक्यापैकी २३ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला आहे. पुणे विभागात खरिपाचे ७.३९ हेक्टर क्षेत्र आहे; पण यावर्षी ९.३६ लाख हेक्टर म्हणजेच १२७ टक्के पेरणी झाली. कोल्हापूर विभागातील ३३ तालुक्यांपैकी २२ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला. या विभागात खरिपाचे ८.0६ लाख हेक्टर क्षेत्र आहे; पण ८.२९ लाख हेक्टर म्हणजेच १0३ टक्के पेरणी झाली आहे. औरंगाबाद विभागातील २८ तालुक्यांपैकी १९ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला आहे. या विभागात खरिपाचे १८.८७ लाख हेक्टर क्षेत्र आहे. तथापि, यावर्षी २0.६९ लाख म्हणजेच ११0 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लातूर विभागातील ४८ तालुक्यापैकी ३८ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला असून, खरिपाच्या २७.२७ लाख हेक्टरपैकी २६.३९ हेक्टर म्हणजेच ९७ टक्के पेरणी झाली आहे. अमरावती विभागातील ५६ तालुक्यापैकी ४७ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला असून, ३२.६८ लाख हेक्टरपैकी ३१.९९ लाख हेक्टर म्हणजेच ९८ टक्के पेरणी आटोपली आहे. नागपूर विभागातील ६४ तालुक्यापैकी ३१ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला आहे. खरिपाच्या १८.९८ लाख हेक्टरपैकी १४.७४ लाख म्हणजेच ७८ टक्के पेरणी झाली आहे. "अमरावती विभागात पावसाने जुलै महिन्यातच सरासरी ओलांडली आहे. पिके उत्तम आहेत. शेतकर्‍यांना आता मशागतीसाठी काही दिवस उघडीप हवी आहे."- एस.आर. सरदार,विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.