शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

राज्यात आता २३१ तालुक्यात पावसाने ओलांडली सरासरी!

By admin | Updated: August 6, 2016 01:46 IST

ऑगस्ट महिन्यातही पाऊस, पण दोन तालुक्यात २५ ते ५0 टक्केच पाऊस.

अकोला, दि. ५: यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात सरासरीच्या १0९ टक्के पाऊस झाला आहे. ३५५ तालुक्यापैकी २३१ तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. १३९.६४ लाख हेक्टरपैकी १३५.0२ लाख हेक्टर म्हणजेच ९७ टक्के पेरण्या आटोपल्या असून, पीकपरिस्थिती सर्वत्र उत्तम आहे; परंतु दोन तालुक्यात २५ ते ५0 तर २६ तालुक्यात केवळ ५0 ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.यावर्षी दमदार सार्वत्रिक पावसामुळे सर्वत्र पिके बहरली आहेत. भात व नाचणी पिकाच्या पुनर्लागवडीची कामे प्रगतिपथावर आहेत. राज्यातील सर्वच विभागात पेरण्या प्रगतिपथावर आहेत. ऑगस्टच्या प्रथम आठवड्यात कोकणात ४७ तालुक्यांपैकी ९ तालुक्यात ७५ ते १00 टक्के, तर ३८ तालुक्यात १00 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला असून, खरिपातील ४.८७ हेक्टरपैकी ३.६९ लाख हेक्टर म्हणजेच ७६ टक्के क्षेत्रावर पेरणी व लागवड झाली आहे. नाशिक विभागातील ४0 तालुक्यांपैकी एका तालुक्यात २५ ते ५0 टक्के, ८ तालुक्यात ५0 ते ७५ टक्के, १८ तालुक्यात ७५ ते १00 टक्के तर १३ तालुक्यात १00 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या विभागात खरिपाच्या २१.५१ लाख हेक्टरपैकी १९.८६ लाख हेक्टर म्हणजेच ९२ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली. पुणे विभागात ३९ तालुक्यापैकी २३ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला आहे. पुणे विभागात खरिपाचे ७.३९ हेक्टर क्षेत्र आहे; पण यावर्षी ९.३६ लाख हेक्टर म्हणजेच १२७ टक्के पेरणी झाली. कोल्हापूर विभागातील ३३ तालुक्यांपैकी २२ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला. या विभागात खरिपाचे ८.0६ लाख हेक्टर क्षेत्र आहे; पण ८.२९ लाख हेक्टर म्हणजेच १0३ टक्के पेरणी झाली आहे. औरंगाबाद विभागातील २८ तालुक्यांपैकी १९ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला आहे. या विभागात खरिपाचे १८.८७ लाख हेक्टर क्षेत्र आहे. तथापि, यावर्षी २0.६९ लाख म्हणजेच ११0 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लातूर विभागातील ४८ तालुक्यापैकी ३८ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला असून, खरिपाच्या २७.२७ लाख हेक्टरपैकी २६.३९ हेक्टर म्हणजेच ९७ टक्के पेरणी झाली आहे. अमरावती विभागातील ५६ तालुक्यापैकी ४७ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला असून, ३२.६८ लाख हेक्टरपैकी ३१.९९ लाख हेक्टर म्हणजेच ९८ टक्के पेरणी आटोपली आहे. नागपूर विभागातील ६४ तालुक्यापैकी ३१ तालुक्यात १00 टक्के पाऊस झाला आहे. खरिपाच्या १८.९८ लाख हेक्टरपैकी १४.७४ लाख म्हणजेच ७८ टक्के पेरणी झाली आहे. "अमरावती विभागात पावसाने जुलै महिन्यातच सरासरी ओलांडली आहे. पिके उत्तम आहेत. शेतकर्‍यांना आता मशागतीसाठी काही दिवस उघडीप हवी आहे."- एस.आर. सरदार,विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.