शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

Attack on Sharad Pawar House: प्रकाश आंबेडकरांचे विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर गंभीर आरोप, निलंबित करण्याची केली मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 12:55 IST

Attack on Sharad Pawar House: शरद पवार यांच्या निवासस्थावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी Prakash Ambedkar यांनी Vishwas Nangre-Patil यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

अकोला - गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी आक्रमक मोर्चा नेला होता. त्यावेळी आंदोलकांकडून पवारांच्या निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक केल्याने हल्ल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर या हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यासह शेकडो एसटी कर्मचाऱ्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, शरद पवार यांच्या निवासस्थावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सिल्वर ओकवरील हल्ला हा पूर्वनियोजित होता. या हल्ल्याची राज्य शासनाला कल्पना होती. तसे पत्र आले होते. मात्र  विश्वास नांगरे-पाटील यांनी या पत्राकडे दुर्लक्ष केले. आता या घटनेचा त्यांच्यावरच चौकशी समितीचा भार देणे आणि त्यांना चौकशी समिती प्रमुख करणे हे चुकीचे आहे.  त्यांना तातडीने पदावरून काढून टाकण्यात यावे, तसेच त्यांची चौकशी करण्यात यावी, त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केला.

विश्वास नांगरे-पाटलांनी गुप्तचर संस्थेचा अहवाल दाबून ठेवला, असा आरोप आंबेडर यांनी केला. तसेच मुंबईवरील हल्ल्याची माहितीही कोस्टल गार्डने दिली होती. तीसुद्धा ४८ तास दाबून ठेवली होती. त्यामुळे आता धडा घ्यावा, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांनाही महत्त्वाचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, कोर्टाने तुम्हाला २२ ताखेपर्यंत संधी दिली आहे. एसटी महामंडळ शाबूत राहिलं पाहिजे, असं वाटत असेल तर एसटी कर्मचाऱ्यांनी विनाअट कामावर रुजू व्हावं. एसटी महामंडळ हे महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण होऊ शकत नाही, हे मी जाहीरपणे सांगतो. जी मागणी मान्यच होऊ शकणार नाही ती लांब पल्ल्याचा इश्शू म्हणून पाहिलं पाहिजे. एसटीचे कर्मचारी कायदेशीर सल्लागांरांमुळे आणि त्यांच्या नेत्यांमुळेही अडचणीत आले आहे, असेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलSharad Pawarशरद पवारMumbaiमुंबई