शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
2
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
5
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
6
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
7
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
8
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
9
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
10
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
11
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
12
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
13
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
14
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
15
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
16
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
17
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
18
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
19
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
20
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक

रतलाम-खंडवा-अकोला रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी एक विघ्न

By atul.jaiswal | Published: September 07, 2021 11:25 AM

Another disruption in Ratlam-Khandwa-Akola railway connectivity : निधी वळता झाल्यास महु- सनावद ब्रॉडगेजचे काम थंडबस्त्यात पडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमहु-सनावद गेज परिवर्तनाचा निधी वळविण्याची मागणी इंदूरच्या खासदारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

- अतुल जयस्वाल

अकोला : उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा सर्वात सरळ व कमी अंतराचा रतलाम-खंडवा- अकोला-नांदेड मार्गे हैदराबाद हा रेल्वे कॉरिडाॅर पूर्णत्वास जाण्याच्या मार्गात आधीच अकोट ते आमलाखुर्द दरम्यानच्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचा अडथळा असताना, आता आणखी एक नवे विघ्न समोर आले आहे. या लोहमार्गातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या महु ते सनावद दरम्यानच्या गेज परिवर्तनासाठी मंजूर झालेला निधी इंदूर-दाहोद रेल्वेलाइनसाठी वळविण्याची मागणी इंदूरचे खासदार शंकर लालवाणी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ३० ऑगस्ट रोजी पाठविलेल्या एका पत्राद्वारे केली आहे. हा निधी वळता झाल्यास महु- सनावद ब्रॉडगेजचे काम थंडबस्त्यात पडण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशातील रतलाम ते अकोला या ४७२ किमी लांबीच्या मीटरगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्यासाठी केंद्र सरकारने २००८ मध्ये हिरवी झेंडी दिली होती. या प्रकल्पात आतापर्यंत रतलाम ते महु, सनावद ते खंडवा व अकोट ते अकोलापर्यंतच्या टप्प्यांचे गेज परिवर्तन झाले असून, महु ते सनावद या ५४ किमी टप्प्याचे गेज परिवर्तन अद्याप बाकी आहे. या कामासाठी ३२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्या हे काम बंद असल्यामुळे या कामासाठी मंजूर असलेल्या निधीपैकी १५० कोटींचा निधी इंदूर ते दाहोद या रेल्वे लाईनसाठी वळता करावा, अशी मागणी करणारे पत्र इंदूरचे भाजप खासदार शंकर लालवाणी यांनी ३० ऑगस्ट रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पाठविले आहे. हे काम आणखी दोन वर्षे सुरु होण्याची शक्यता नसल्याचा तर्क त्यांनी दिला आहे. दिल्ली दरबारात राजकीय वजन असलेल्या लालवाणी यांची मागणी मंजूर होऊन निधी वळता झाल्यास महु- सनावद ब्रॉडगेज परिवर्तनाच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो.

व्याघ्र प्रकल्पामुळे अकोट ते अमला खुर्द काम ठप्प

रतलाल - खंडवा - अकोला लोहमार्गाचे बहुतांश गेज परिवर्तन झाले असून, अकोट ते अमला खुर्दपर्यंतचे ७७ किमी गेज परिवर्तनाचे काम रखडलेले आहे. हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्यामुळे गेज परिवर्तनाचे काम बाहेरून वळते करावे, अशी याचिका पर्यावरणवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. राज्य शासनानेही मेळघाटातून ब्रॉडगेजचे काम होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्यातरी हे काम मार्गी लागण्याची शक्यता नाही.

 

खंडवा ते अमला खुर्द काम सुरु

गेज परिवर्तन प्रकल्पात अकोट ते अमला खुर्द काम ठप्प असले तरी खंडवा ते अमला खुर्दपर्यंतच्या ५३ किमी मार्गाच्या गेज परिवर्तनाचे काम धिम्या गतीने सुरु आहे. गिरहीपर्यंत पूल व इतर कामे झालेली आहेत. त्यामुळे गेज परिवर्तनाचे काम मेळघाटामधूनच जाईल अशी आशा या मार्गाच्या समर्थकांमध्ये अजूनही जागृत आहे.

टॅग्स :Akola-Khandwa Gauge Conversionअकोला-खांडवा गेज रूपांतरणIndian Railwayभारतीय रेल्वेindore-pcइंदौर