शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
2
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
3
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
4
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
5
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
8
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
9
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
10
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
11
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
12
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
13
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
14
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
15
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
16
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
17
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
18
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
19
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
20
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

‘बोंडअळी’प्रमाणे मदतीची घोषणा फोल ठरू नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:44 IST

शासनाकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्या जाणार की काय, अशी भीती राज्यातील शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे.

- सदानंद सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कापूस आणि धान पिकाला २०१७-१८ च्या खरीप हंगामात प्रचंड फटका बसला होता. त्यावेळी डिसेंबर २०१७ च्या हिवाळी अधिवेशनात हेक्टरी ३६ हजार रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अति पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी आता शेतकऱ्यांना सरसकट २५ हजारांची मागणी पुढे येत असताना पूर्वीप्रमाणेच घोषणा करून शासनाकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्या जाणार की काय, अशी भीती राज्यातील शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे.खरीप २०१७ च्या हंगामात राज्यातील कापूस पिकावर बोंडअळी तर धानावर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी विरोधकांनी केलेल्या मागणीच्या गदारोळात डिसेंबर २०१७ च्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी हेक्टरी ३६ हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती.त्यामध्ये कापूस बियाणे उत्पादक कंपन्या, पीक विमा कंपन्यांचा वाटा धरून ही रक्कम असल्याचेही त्यांनी सांगितले होते. ही घोषणा नंतर हवेतच विरली. बीटी कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांनी भरपाई देण्यास हात वर केले. तर विमा कंपन्यांनीही पैसेवारी तसेच पीक स्थितीचा आधार घेत भरपाईची रक्कम देताना हात आखडता घेतला होता. ३६ हजारांपैकी किमान ३० हजार रुपये या दोन्ही कंपन्यांकडून शेतकºयांना मिळवून देता आले नाही. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस पुरते तोंडघशी पडले होते.बीटी बियाणे, विमा कंपन्यांच्या हिश्शाची गृहीत धरलेली रक्कम वगळून केवळ नैसर्गिक आपत्तीतून शासनाकडून दिली जाणारी हेक्टरी ६,८०० रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. महसूल व वन विभागाच्या २३ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या या निर्णयातून मुख्यमंत्र्यांच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणेचा फोलपणा स्पष्ट झाला होता. त्यावेळी कापूस आणि धान पिकाला कोरडवाहूसाठी प्रती हेक्टरी ६,८०० तर बागायतीसाठी १३,५०० रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात आली. अति पाऊस हा नैसर्गिक आपत्तीत येत असल्याने याच दराने मदत जाहीर होण्याची शक्यता आहे. तर विमा कंपन्या पिकाच्या शंभर टक्के नुकसानासाठी किती मदत देणार, या प्रमाणावरच शेतकºयांच्या पदरात मदत पडणार आहे. त्यातही पीक विमा न काढलेल्या शेतकºयांना आधीच्या दरानुसारच मदत दिली जाईल का, या धास्तीने शेतकरी गर्भगळित झाले आहेत. रब्बीच्या पेरणीसाठी बियाणे खरेदी करण्यालाही ती रक्कम अपुरी पडणार आहे. मदतीच्या रकमेबाबत शेतकºयांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती