शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

‘बोंडअळी’प्रमाणे मदतीची घोषणा फोल ठरू नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:44 IST

शासनाकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्या जाणार की काय, अशी भीती राज्यातील शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे.

- सदानंद सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कापूस आणि धान पिकाला २०१७-१८ च्या खरीप हंगामात प्रचंड फटका बसला होता. त्यावेळी डिसेंबर २०१७ च्या हिवाळी अधिवेशनात हेक्टरी ३६ हजार रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अति पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी आता शेतकऱ्यांना सरसकट २५ हजारांची मागणी पुढे येत असताना पूर्वीप्रमाणेच घोषणा करून शासनाकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्या जाणार की काय, अशी भीती राज्यातील शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे.खरीप २०१७ च्या हंगामात राज्यातील कापूस पिकावर बोंडअळी तर धानावर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावेळी विरोधकांनी केलेल्या मागणीच्या गदारोळात डिसेंबर २०१७ च्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी हेक्टरी ३६ हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती.त्यामध्ये कापूस बियाणे उत्पादक कंपन्या, पीक विमा कंपन्यांचा वाटा धरून ही रक्कम असल्याचेही त्यांनी सांगितले होते. ही घोषणा नंतर हवेतच विरली. बीटी कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांनी भरपाई देण्यास हात वर केले. तर विमा कंपन्यांनीही पैसेवारी तसेच पीक स्थितीचा आधार घेत भरपाईची रक्कम देताना हात आखडता घेतला होता. ३६ हजारांपैकी किमान ३० हजार रुपये या दोन्ही कंपन्यांकडून शेतकºयांना मिळवून देता आले नाही. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस पुरते तोंडघशी पडले होते.बीटी बियाणे, विमा कंपन्यांच्या हिश्शाची गृहीत धरलेली रक्कम वगळून केवळ नैसर्गिक आपत्तीतून शासनाकडून दिली जाणारी हेक्टरी ६,८०० रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. महसूल व वन विभागाच्या २३ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या या निर्णयातून मुख्यमंत्र्यांच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणेचा फोलपणा स्पष्ट झाला होता. त्यावेळी कापूस आणि धान पिकाला कोरडवाहूसाठी प्रती हेक्टरी ६,८०० तर बागायतीसाठी १३,५०० रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात आली. अति पाऊस हा नैसर्गिक आपत्तीत येत असल्याने याच दराने मदत जाहीर होण्याची शक्यता आहे. तर विमा कंपन्या पिकाच्या शंभर टक्के नुकसानासाठी किती मदत देणार, या प्रमाणावरच शेतकºयांच्या पदरात मदत पडणार आहे. त्यातही पीक विमा न काढलेल्या शेतकºयांना आधीच्या दरानुसारच मदत दिली जाईल का, या धास्तीने शेतकरी गर्भगळित झाले आहेत. रब्बीच्या पेरणीसाठी बियाणे खरेदी करण्यालाही ती रक्कम अपुरी पडणार आहे. मदतीच्या रकमेबाबत शेतकºयांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती