मुलींमध्ये मुग्धा खंडारे तर मुलांमध्ये जयपुरीने मारली बाजी
By Admin | Updated: May 28, 2015 18:57 IST2015-05-28T18:57:38+5:302015-05-28T18:57:38+5:30
आरएलटी विज्ञान महाविद्यालयाची मुग्धा खंडारेने ९६.६१ टक्के गुण मिळवून बाजी मारली.

मुलींमध्ये मुग्धा खंडारे तर मुलांमध्ये जयपुरीने मारली बाजी
अकोला : बारावीच्या परीक्षेत मुलीमध्ये आरएलटी विज्ञान महाविद्यालयाची मुग्धा खंडारेने ९६.६१ टक्के गुण मिळवून बाजी मारली तर मुलांमध्ये आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचा आफ्रिद जयपुरीने ९६.४६ टक्के गुण मिळवून बाजी मारली. आरएलटी विज्ञान महाविद्यालयाने यंदाही बारावीच्या निकालात आघाडी घेतली. या महाविद्यालयाच्या मुग्धा खंडारने प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत ९६.६१ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला. तिने मुलींमध्येही जिल्ह्यात आघाडी घेतली. तिला ६५0 पैकी ६२८ गुण मिळाले. बारावी परीक्षेत मुलींनी जिल्ह्यात बाजी मारली असली तरी मुलंही मागे राहिले नाहीत. आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाच्या आफ्रिद जयपुरीने ६५0 पैकी ६२७ गुण मिळविले. त्याला ९६.४६ टक्के गुण मिळाले आहे.