शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांच्या ‘वंचित’ प्रयोगाला ‘ब्रेक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 23:20 IST

आंबेडकरांच्या ‘वंचित’ प्रयोगाला ‘ब्रेक’! लागला आहे.

राजेश शेगोकार अकोला : सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाºया अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. भारिप, भारिप-बमसं, रिडालोस, अशा अनेक प्रयोगांनंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी ‘एमआयएम’ला सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केला. आता ‘वंचित’मधून ‘एमआयएम’ बाहेर पडल्यामुळे ‘वंचित’च्या प्रयोगाला मोठा ‘ब्रेक’ बसला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी ते कोणत्या नव्या भिडूसोबत सत्तेचा सारिपाट मांडतात, याकडे लक्ष लागले आहे. १९८० मध्ये अकोल्यात दाखल झालेल्या अ‍ॅड. आंबेडकरांनी राजकारणामध्ये ‘सामाजिक अभियांत्रिकी’च्या माध्यमातून सत्तेत जाण्याचा यशस्वी प्रयोग केला. प्रारंभी त्यांनी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षावर काम सुरू केले. १९८४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी याच पक्षावर लढविली. त्यावेळी त्यांचा अवघ्या १३ हजार मतांनी पराभव झाला. पुढे काँग्रेससोबत त्यांनी आघाडी करून लोकसभा गाठली; मात्र लवकरच भारिपचा विस्तार करीत बहुजन महासंघाची जोड देत अकोला पॅटर्नची मुहूर्तमेढ रोवली. या भारिप बहुजन महासंघाने १९९० ते २००४ पर्यंत राज्यात समर्थ पर्याय उभा केला. त्यानंतर मात्र अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगाला फारसे यश मिळाले नाही. स्वत: अ‍ॅड. आंबेडकर हे १९९९ नंतर सलग चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. विधानसभा निवडणुकीत एकमेव आमदार निवडून आणता आला. दरम्यानच्या काळात त्यांनी विविध राजकीय प्रयोग केले. कापसाच्या प्रश्नावर डाव्या आघाडीला सोबत घेऊन त्यांनी माकपचे तत्कालीन नेते प्रकाश कारत यांच्यासह मेळावेसुुद्धा घेतले. कधी लहान-मोठ्या संघटनांची मोट बांधली तर कधी विविध समाजांसाठी जागर मेळावे घेऊन बहुजन मतपेढी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. २००९ मध्ये १४ पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘रिडालोस’चा ते हिस्सा झाले; मात्र २०१९ मध्ये धनगर, ओबीसी, मुस्लीम यांना एकत्र करीत वंचित बहुजन आघाडीला जन्म दिला. याद्वारे जातनिहाय उमेदवार जाहीर करून वंचित समाजाच्या अस्मितेवर फुंकर घातली. या फुंकरमुळेच राज्यातील नऊ लोकसभा मतदारसंघांत विजयाचे स्वप्न पाहणाºया काँग्रेस आघाडीच्या आशेची ज्योत विझली व ‘वंचित’ची ताकद विधानसभेत किती पडझड करेल, याची गणिते मांडली जाऊ लागली; मात्र याच दरम्यान ‘एमआयएम’ने त्यांची साथ सोडली. ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीच आघाडी संपल्याचे जाहीर केल्यानंतर आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने आता ते आणखी कोणता प्रयोग करतात, याकडे लक्ष लागले आहे.
टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkolaअकोला