शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

काँग्रेसला दिलेला आंबेडकरांचा ‘अल्टीमेटम’ आज संपणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 12:48 IST

 अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी समविचारी पक्षांशी युती करून मतांचे विभाजन टाळण्यासाठी जुलै २०१८ मध्येच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने दोन मागण्यांचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाला दिला.

- राजेश शेगोकार अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी समविचारी पक्षांशी युती करून मतांचे विभाजन टाळण्यासाठी जुलै २०१८ मध्येच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने दोन मागण्यांचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाला दिला. त्यावर काँग्रेसने अद्याप निर्णय घेतलेला नाही. ३० जानेवारीपर्यंत निर्णय न झाल्यास ३१ जानेवारी रोजी निर्णय घेण्यास वंचित बहुजन आघाडी मोकळी राहील, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. त्या ‘अल्टीमेटम’ची मुदत आज संपणार असून, काँग्रेसच्या भूमिकेवरच महाआघाडीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाºया अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी त्यांनी ‘एमआयएम’सोबत आघाडी जाहीर करताच काँग्रेसने आंबेडकरांचे मन वळविण्यास सुरुवात केली. यादरम्यान अ‍ॅड. आंबेडकरांनी काँग्रेससोबत जाण्यास अनुकूलता दाखविली असली, तरी दुसरीकडे काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी त्यांनी गमावली नाही. या पृष्ठभूमीवर अ‍ॅड. आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीसाठी राज्यात १२ जागा देण्यात याव्यात तसेच देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांच्या आराखड्याची अंमलबजावणी अशा स्वरूपाचा प्रस्ताव काँग्रेसकडे दिला आहे. या प्रस्तावावर काँग्रेसने गेल्या सहा महिन्यांत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अखेर अ‍ॅड. आंबेडकरांनी शेवटचा ‘अल्टीमेटम’ दिला आहे.  ‘एमआयएम’सोबतची मैत्री घट्ट अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबत मैत्री जाहीर करून या मैत्रीचा नारळ गांधी जयंतीला औरंगाबाद येथे फोडला. भारिप-बमसं व एमआयएम या मैत्रीमुळे धर्मनिरपेक्ष मतांमध्ये मोठे विभाजन घडेल, या भीतीने काँग्रेसने अ‍ॅड. आंबेडकरांशी बोलणी सुरू केली; मात्र एमआयएम नको या मुद्यावर काँग्रेस ठाम आहे, तर दुसरीकडे अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबतची मैत्री घट्ट करीत राज्यभरात जाहीर सभांचा सपाटा सुरू केला आहे. या सभांमध्ये काँग्रेसवर तोंडसुख घेण्याची एकही संधी आंबेडकरांनी सोडलेली नाही, हे विशेष.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघPoliticsराजकारणAkolaअकोला