शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

आंबेडकरांचा ‘ओवेसी’ प्रयोग; ‘एमआयएम’सोबत आघाडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 13:31 IST

अकोला: सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला.

ठळक मुद्दे पुरोगामी पक्षांसोबत आघाडीची तयारी दर्शवित त्यांनी काँग्रेसकडे दहा जागांचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावर चर्चा होण्याअगोदरच त्यांनी ‘एमआयएम’सोबत आघाडीचा मुर्हूतही जाहीर केला. हा ‘ओवेसी’ प्रयोग पश्चिम वºहाडासह मराठवाड्यातील काही मतदारसंघांत नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहे.

-  राजेश शेगोकार

अकोला: सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणातअकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाºया अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पुरोगामी पक्षांसोबत आघाडीची तयारी दर्शवित त्यांनी काँग्रेसकडे दहा जागांचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावर चर्चा होण्याअगोदरच त्यांनी ‘एमआयएम’सोबत आघाडीचा मुहूर्तही जाहीर केला. आंबेडकरांच्या हा आणखी एक राजकीय प्रयोग आहे. या ‘ओवेसी’ प्रयोगाचा पश्चिम वºहाडासह मराठवाड्यातील काही मतदारसंघांत नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहे. अ‍ॅड. आंबेडकरांनी ९० च्या दशकात ‘सामाजिक अभियांत्रिकी’च्या माध्यमातून सत्ता मिळविण्याचा यशस्वी प्रयोग अकोल्यात केला. अकोला पॅटर्न नावाने ओळखल्या जाणाºया या प्रयोगाचे राजकीय नाव म्हणजे ‘भारिप बहुजन महासंघ’. १९९० ते २००४ पर्यंत या प्रयोगाने सुवर्णकाळ अनुभवला, असे म्हणता येईल. यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांकडे दोन ‘हुकुमी एक्के’ होते. यातील एक म्हणजे आंबेडकर, हे ब्रँडनेम, तर दुसरे म्हणजे स्वत:च्या दलित समाजासोबत अठरापगड जातींची बांधलेली मोट. यामुळेच अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा अशा प्रत्येक ठिकाणी त्यांना यश अनुभवता आले. स्वत: आंबेडकर हे दोन वेळा खासदार झाले. डी. एम. भांडे, मखराम पवार, रामदास बोडखे यांना मंत्रिपदाची ऊबही मिळाली. हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांना आमदार म्हणून मिरविता आले. अकोल्याची जिल्हा परिषद आजतागायत भारिप-बमसंकडे कायम राहिली. अकोल्याबाहेर नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये भीमराव केराम, धुळे जिल्ह्यातील साक्री मतदारसंघातून वसंतराव सूर्यवंशी, असे आमदारही त्यांनी निवडून आणले; मात्र गेल्या काही वर्षांत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगाला अपयशाचे थोडे डाग लागले आहेत. स्वत: अ‍ॅड. आंबेडकर हे १९९९ नंतर सलग तीनदा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या संपूर्ण काळात त्यांनी विविध राजकीय प्रयोग केले. कापसाच्या प्रश्नावर डाव्या आघाडीला सोबत घेऊन त्यांनी माकपचे तत्कालीन नेते प्रकाश करात यांच्यासह मेळावेसुद्धा घेतले. दरम्यानच्या काळात कधी लहान-मोठ्या संघटनांची मोट बांधली. २००९ मध्ये १४ पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘रिडालोस’चा ते हिस्सा झाले. परंपरागत मते अन् ओबीसींची सांगड घालत त्यांनी दोन वर्षांपूर्वी ओबीसींचा जागर सुरू केला. जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व हाती घेत निवडणुकीचा बिगुल फुंकला व काँग्रेसला १० जागांचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावासंदर्भात काँग्रेसची स्पष्ट भूमिका जाहीर होण्यापूर्वीच आता त्यांनी ‘एमआयएम’सोबत जाण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे त्यांनी नवा सारिपाट मांडल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPoliticsराजकारण