शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

पुणे-मुंबईतअडकलेल्या विद्यार्थ्यांनाही स्वगृही येण्याची परवानगी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 17:57 IST

पुणे व मुंबई येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.

अकोला : लॉकडाऊनमुळे राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील १८०० विद्यार्थ्यांना येत्या आठ दिवसात परत आणल्या जाईल व ३ मे पर्यंत त्यांना सुखरूप घरि पोहचविले जाईल असे महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषित केले आहे. या निर्णयाचे स्वागत करतानाच याच धर्तीवर पुणे व मुंबई येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.केंद्र सरकारने विदेशात अडकलेल्या विद्यार्थी व लोकांना विशेष विमानाने भारतातर आणले शिवाय त्यांना त्यांच्या घरि पोहचविले. ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. परंतु पुण्या मुंबई सारख्या शहरात महाराष्ट्राच्या ईतर भागातुन आलेल्या व अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात मात्र सरकार उदासिन असल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातुन गरीब विद्यार्थी विद्यार्थी पुणे व मुंबई येथे शिकतात. आजही या महानगरांमध्ये हजारो विद्यार्थी अडकलेले आहेत. लॉकडाडनमुळे या विद्यार्थ्यांचे जेवनाचे हाल होत आहेत. सर्वच मुलांना हाताने स्वयंपाक करणे जमत नाही. अशावेळी त्यांना उपाशी राहण्याशिवाय पर्याय नाही. हे सर्व विद्यार्थी गेल्या २२ मार्च पासून तिथेच अडकलेले आहेत. सद्या ते करोना संक्रमणा पासून सुरक्षित आहेत. परंतु सध्याची परिस्थिती पाहता खाण्यापीण्याच्या वस्तूंकरीता त्यांना बाहेर पडावे लागत असल्याने त्यांना करोना संसगार्चा धोका कायम आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे पालक त्यांना घरी आणण्याची व्यवस्था करण्यास तयार आहेत; परंतु शासनाला या गरीब विद्यार्थ्यांचा विसर पडल्याचे दिसुन येते हा प्रकार त्या सर्व विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्यासारखा आहे. हवे तर त्या विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी करा; परंतु त्यांना घरी जाण्यास परवानगी द्यावी. जेणेकरून ते सर्व विद्यार्थी करोनाच्या हॉटस्पॉट सारख्या भागातुन त्यांच्या घरि सुखरुप राहतील व प्रशासनाचा देखील ताण कमी होईल अशी मागणी वंचित बहुजन आघाडीची असल्याचे प्रदेश प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी