शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

अकोट : मेळघाटातील पुनर्वसित गावकर्‍यांनी केली जमिनीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:17 IST

अकोट : मेळघाटातून अकोट उपविभागात पुनर्वसन करण्यात आलेल्या आठ गावांतील ग्रामस्थांनी शेतजमिनींसह इतर मागण्यांकरिता मेळघाटमध्ये जाऊन जुन्या गावात बस्तान मांडले आहे. दरम्यान, चर्चेकरिता गेलेल्या लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकार्‍यांना पुनर्वसित गावकर्‍यांनी ई-क्लासच्या आधी जमिनी पाहू व नंतर सामूहिक निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. त्यावरून पुनर्वसित गावकर्‍यांनी अकोट  तालुक्यातील ई-क्लासच्या जमिनीची  तहसीलदार विश्‍वनाथ घुगे यांच्या उपस्थितीत पाहणी केली.

ठळक मुद्दे२६ गावांत ई-क्लासची २८0 हेक्टर जमीन उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : मेळघाटातून अकोट उपविभागात पुनर्वसन करण्यात आलेल्या आठ गावांतील ग्रामस्थांनी शेतजमिनींसह इतर मागण्यांकरिता मेळघाटमध्ये जाऊन जुन्या गावात बस्तान मांडले आहे. दरम्यान, चर्चेकरिता गेलेल्या लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकार्‍यांना पुनर्वसित गावकर्‍यांनी ई-क्लासच्या आधी जमिनी पाहू व नंतर सामूहिक निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. त्यावरून पुनर्वसित गावकर्‍यांनी अकोट  तालुक्यातील ई-क्लासच्या जमिनीची  तहसीलदार विश्‍वनाथ घुगे यांच्या उपस्थितीत पाहणी केली.मेळघाटमधून केलपाणी, गुल्लरघाट, नागरतास, बारुखेडा, सोमठाणा बु., सोमठाणा खु., अमोना, धारगड या आठ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु, वातावरण मानवत नाही, शेत जमिनी नाही. त्यामुळे हे गावकरी पुन्हा जुन्या गावी जात आहेत. जमिनी मिळाल्याशिवाय जंगलाबाहेर निघणार नसल्याची भूमिका पुनर्वसित गावकर्‍यांनी घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पुनर्वसित गावकर्‍यांना जमिनी देण्याचा आदेश काढला आहे. तो आदेश घेऊन अकोला, अमरावतीचे जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी मेळघाटात जाऊन पुनर्वसित गावकर्‍यांशी चर्चा केली. परंतु, आधी ई-क्लासच्या जमिनी पाहून आल्यानंतरच सामूहिक निर्णय घेणार असल्याचे पुनर्वसित गावकर्‍यांनी अधिकार्‍यांना सांगितले. त्यामुळे शासनाच्यावतीने त्यांना ई-क्लासच्या जमिनी पाहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदार विश्‍वनाथ घुगे व इतर अधिकारी, तलाठी, पटवार्‍यांसह पुनर्वसित गावकर्‍यांनी दहीखेल फुटकर या परिसरात उपलब्ध असलेल्या ई-क्लासच्या जमिनीची पाहणी केली आहे. तालुक्यातील २६ गावात ई-क्लासच्या जमिनी उपलब्ध आहेत. त्या जमिनीचे मोजमाप करण्याच्या दृष्टीने भूमी अभिलेख कार्यालयाचे सहा पथक नियुक्त केले आहेत. तालुक्यात दहीखेल फुटकर, दिवठाणा, रामटेक, केळीवेळी, धामणगाव, रामापूर, धारुर, बोचरा, रुधाडी, हनवाडी, खासबाग, राहणापूर, कुटासा, करतवाडी, कावसा, मरोडा,  तांदूळवाडी, चोरवड खु., खैरखेड बु., हिलालाबाद, शहापूर, नांदखेड,  कवठा खु., लामकाणी, खिरकुंड खुर्द, बळेगाव आदी गावांत २८0 हेक्टर ई-क्लासची जमिन उपलब्ध आहे. ही जमीन पुनर्वसित गावकर्‍यांना दाखविल्यानंतर ती पेरणीयोग्य आहे किंवा काय आदी बाबतचा आढावा घेऊन पुनर्वसित गावकरी सामूहिक निर्णय घेणार असल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, मेळघाटमध्ये ठाण मांडून बसलेल्या पुनर्वसित गावकरी व वन विभागामध्ये संघर्ष पेटला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशा स्थितीत  शासन पुनर्वसित गावकर्‍यांच्या समस्या कधी व कशाप्रकारे निकाली काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Melghatमेळघाटakotअकोट