शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पुनर्वसित गावकर्‍यांनी गाठले मेळघाट; रोखण्यास वन अधिकारी व पोलीस ठरले हतबल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 22:08 IST

अकोट : आठ दिवसात शेती पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणार्‍या पुनर्वसित गावकर्‍यांनी  मेळघाटात जाऊन हक्काची शेती वाहू द्या, शेती मिळेल तेव्हा परत येऊ, असा नारा देत पुनर्वसित  गावकरी २५ डिसेंबर रोजी अमोना गेट पार करून मेळघाटात घुसले. मेळघाटात जाण्यापासून रोख ताना शेकडो पुनर्वसितांच्या समोर वन विभागाचे अधिकारी व पोलीस मात्र हतबल झाले होते. 

ठळक मुद्देमेळघाटातील आठ गावांचे अकोट उपविभागात पुनर्वसन करण्यात आले आहेपुनर्वसित गावकर्‍यांनी ‘हक्काची शेती वाहू द्या’अशी आग्रही भूमिका घेत, सोमवारी अमोना गेट पार  केलेमेळघाटात शिरणार्‍या शेकडो पुनर्वसितांना रोखण्यास वन विभागाचे अधिकारी व पोलीस ठरले हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : आठ दिवसात शेती पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणार्‍या पुनर्वसित गावकर्‍यांनी  मेळघाटात जाऊन हक्काची शेती वाहू द्या, शेती मिळेल तेव्हा परत येऊ, असा नारा देत पुनर्वसित  गावकरी २५ डिसेंबर रोजी अमोना गेट पार करून मेळघाटात घुसले. मेळघाटात जाण्यापासून रोख ताना शेकडो पुनर्वसितांच्या समोर वन विभागाचे अधिकारी व पोलीस मात्र हतबल झाले होते. 

मेळघाटातून आठ गावांचे अकोट उपविभागात पुनर्वसन करण्यात आले आहे. मूलभूत सुविधा व  उदरनिर्वाहाकरिता  शेती नसल्याने शेतीच्या प्रमुख मागणीला घेऊन पुनर्वसित गावकर्‍यांनी गेल्या  काही महिन्यांपासून मेळघाटात पुन्हा परतण्याचे आंदोलन सुरू केले. एकवेळ मेळघाटात गेल्यानंतर  ते आश्‍वासनानंतर अकोट तालुक्यात परतले होते. त्यानंतर केलपाणी येथे पुन्हा एकत्र आलेल्या  पुनर्वसित गावकर्‍यांच्या शेतीच्या मागणीसंदर्भात नागपूर येथे आमदार बच्चू कडू व पुनर्वसित  गावकर्‍यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. यामध्ये जेथे ई-क्लासची शेती उ पलब्ध असेल, ती पुनर्वसित पात्र कुटुंबांना देण्याकरिता प्रक्रिया राबविण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी  ११ डिसेंबर रोजी आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांना दिला; परंतु पुनर्वसित गावकर्‍यांनी आठ दिवसांच्या  आत शेती पाहिजे, अशी मागणी करूनही तसे प्रशासनाने लेखी दिले नाही म्हणून उदरनिर्वाहाकरिता  मेळघाटमधील पूर्वीच्या गावी जाऊन आमची हक्काची शेती वाहू द्या व शेती द्याल तेव्हा परत येऊ,  अशी भूमिका घेत सोमवारी अमोना गेट पार करून मेळघाटात प्रवेश केला. यावेळी वन विभागाचे  २00 अधिकारी कर्मचारी व ३५ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा ताफा हजर होता; परंतु  शेकडोंच्या संख्येने असलेले पुनर्वसित गावकरी हे जीवनोपयोगी साहित्य घेऊन मुलाबाळांसह  मेळघाटात गेले आहेत. यावेळी पुनर्वसित गावकर्‍यांची समजूत काढण्याकरिता अमोना गेटवर उ पवनसंरक्षक गुरुप्रसाद, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, उपविभागीय  पोलीस अधिकारी गावीत, ग्रामीण पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर यांच्यासह वन, महसूल व  पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ई-क्लासच्या शेतीचा  शोध घेऊन पुनर्वसित गावकर्‍यांना शेती देण्याबाबत प्रक्रिया राबविण्याच्या दिलेल्या आदेशानुसार  ई-क्लासची जमीन शोधण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले असल्याची माहिती प्राप्त झाली  आहे. 

टॅग्स :akotअकोटMelghatमेळघाटAkola Ruralअकोला ग्रामीण