शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

अखेर पुनर्वसित गावकर्‍यांनी गाठले मेळघाट; रोखण्यास वन अधिकारी व पोलीस ठरले हतबल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 22:08 IST

अकोट : आठ दिवसात शेती पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणार्‍या पुनर्वसित गावकर्‍यांनी  मेळघाटात जाऊन हक्काची शेती वाहू द्या, शेती मिळेल तेव्हा परत येऊ, असा नारा देत पुनर्वसित  गावकरी २५ डिसेंबर रोजी अमोना गेट पार करून मेळघाटात घुसले. मेळघाटात जाण्यापासून रोख ताना शेकडो पुनर्वसितांच्या समोर वन विभागाचे अधिकारी व पोलीस मात्र हतबल झाले होते. 

ठळक मुद्देमेळघाटातील आठ गावांचे अकोट उपविभागात पुनर्वसन करण्यात आले आहेपुनर्वसित गावकर्‍यांनी ‘हक्काची शेती वाहू द्या’अशी आग्रही भूमिका घेत, सोमवारी अमोना गेट पार  केलेमेळघाटात शिरणार्‍या शेकडो पुनर्वसितांना रोखण्यास वन विभागाचे अधिकारी व पोलीस ठरले हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : आठ दिवसात शेती पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणार्‍या पुनर्वसित गावकर्‍यांनी  मेळघाटात जाऊन हक्काची शेती वाहू द्या, शेती मिळेल तेव्हा परत येऊ, असा नारा देत पुनर्वसित  गावकरी २५ डिसेंबर रोजी अमोना गेट पार करून मेळघाटात घुसले. मेळघाटात जाण्यापासून रोख ताना शेकडो पुनर्वसितांच्या समोर वन विभागाचे अधिकारी व पोलीस मात्र हतबल झाले होते. 

मेळघाटातून आठ गावांचे अकोट उपविभागात पुनर्वसन करण्यात आले आहे. मूलभूत सुविधा व  उदरनिर्वाहाकरिता  शेती नसल्याने शेतीच्या प्रमुख मागणीला घेऊन पुनर्वसित गावकर्‍यांनी गेल्या  काही महिन्यांपासून मेळघाटात पुन्हा परतण्याचे आंदोलन सुरू केले. एकवेळ मेळघाटात गेल्यानंतर  ते आश्‍वासनानंतर अकोट तालुक्यात परतले होते. त्यानंतर केलपाणी येथे पुन्हा एकत्र आलेल्या  पुनर्वसित गावकर्‍यांच्या शेतीच्या मागणीसंदर्भात नागपूर येथे आमदार बच्चू कडू व पुनर्वसित  गावकर्‍यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. यामध्ये जेथे ई-क्लासची शेती उ पलब्ध असेल, ती पुनर्वसित पात्र कुटुंबांना देण्याकरिता प्रक्रिया राबविण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी  ११ डिसेंबर रोजी आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांना दिला; परंतु पुनर्वसित गावकर्‍यांनी आठ दिवसांच्या  आत शेती पाहिजे, अशी मागणी करूनही तसे प्रशासनाने लेखी दिले नाही म्हणून उदरनिर्वाहाकरिता  मेळघाटमधील पूर्वीच्या गावी जाऊन आमची हक्काची शेती वाहू द्या व शेती द्याल तेव्हा परत येऊ,  अशी भूमिका घेत सोमवारी अमोना गेट पार करून मेळघाटात प्रवेश केला. यावेळी वन विभागाचे  २00 अधिकारी कर्मचारी व ३५ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा ताफा हजर होता; परंतु  शेकडोंच्या संख्येने असलेले पुनर्वसित गावकरी हे जीवनोपयोगी साहित्य घेऊन मुलाबाळांसह  मेळघाटात गेले आहेत. यावेळी पुनर्वसित गावकर्‍यांची समजूत काढण्याकरिता अमोना गेटवर उ पवनसंरक्षक गुरुप्रसाद, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, उपविभागीय  पोलीस अधिकारी गावीत, ग्रामीण पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर यांच्यासह वन, महसूल व  पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ई-क्लासच्या शेतीचा  शोध घेऊन पुनर्वसित गावकर्‍यांना शेती देण्याबाबत प्रक्रिया राबविण्याच्या दिलेल्या आदेशानुसार  ई-क्लासची जमीन शोधण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले असल्याची माहिती प्राप्त झाली  आहे. 

टॅग्स :akotअकोटMelghatमेळघाटAkola Ruralअकोला ग्रामीण