शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

अखेर पुनर्वसित गावकर्‍यांनी गाठले मेळघाट; रोखण्यास वन अधिकारी व पोलीस ठरले हतबल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 22:08 IST

अकोट : आठ दिवसात शेती पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणार्‍या पुनर्वसित गावकर्‍यांनी  मेळघाटात जाऊन हक्काची शेती वाहू द्या, शेती मिळेल तेव्हा परत येऊ, असा नारा देत पुनर्वसित  गावकरी २५ डिसेंबर रोजी अमोना गेट पार करून मेळघाटात घुसले. मेळघाटात जाण्यापासून रोख ताना शेकडो पुनर्वसितांच्या समोर वन विभागाचे अधिकारी व पोलीस मात्र हतबल झाले होते. 

ठळक मुद्देमेळघाटातील आठ गावांचे अकोट उपविभागात पुनर्वसन करण्यात आले आहेपुनर्वसित गावकर्‍यांनी ‘हक्काची शेती वाहू द्या’अशी आग्रही भूमिका घेत, सोमवारी अमोना गेट पार  केलेमेळघाटात शिरणार्‍या शेकडो पुनर्वसितांना रोखण्यास वन विभागाचे अधिकारी व पोलीस ठरले हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : आठ दिवसात शेती पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणार्‍या पुनर्वसित गावकर्‍यांनी  मेळघाटात जाऊन हक्काची शेती वाहू द्या, शेती मिळेल तेव्हा परत येऊ, असा नारा देत पुनर्वसित  गावकरी २५ डिसेंबर रोजी अमोना गेट पार करून मेळघाटात घुसले. मेळघाटात जाण्यापासून रोख ताना शेकडो पुनर्वसितांच्या समोर वन विभागाचे अधिकारी व पोलीस मात्र हतबल झाले होते. 

मेळघाटातून आठ गावांचे अकोट उपविभागात पुनर्वसन करण्यात आले आहे. मूलभूत सुविधा व  उदरनिर्वाहाकरिता  शेती नसल्याने शेतीच्या प्रमुख मागणीला घेऊन पुनर्वसित गावकर्‍यांनी गेल्या  काही महिन्यांपासून मेळघाटात पुन्हा परतण्याचे आंदोलन सुरू केले. एकवेळ मेळघाटात गेल्यानंतर  ते आश्‍वासनानंतर अकोट तालुक्यात परतले होते. त्यानंतर केलपाणी येथे पुन्हा एकत्र आलेल्या  पुनर्वसित गावकर्‍यांच्या शेतीच्या मागणीसंदर्भात नागपूर येथे आमदार बच्चू कडू व पुनर्वसित  गावकर्‍यांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. यामध्ये जेथे ई-क्लासची शेती उ पलब्ध असेल, ती पुनर्वसित पात्र कुटुंबांना देण्याकरिता प्रक्रिया राबविण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी  ११ डिसेंबर रोजी आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांना दिला; परंतु पुनर्वसित गावकर्‍यांनी आठ दिवसांच्या  आत शेती पाहिजे, अशी मागणी करूनही तसे प्रशासनाने लेखी दिले नाही म्हणून उदरनिर्वाहाकरिता  मेळघाटमधील पूर्वीच्या गावी जाऊन आमची हक्काची शेती वाहू द्या व शेती द्याल तेव्हा परत येऊ,  अशी भूमिका घेत सोमवारी अमोना गेट पार करून मेळघाटात प्रवेश केला. यावेळी वन विभागाचे  २00 अधिकारी कर्मचारी व ३५ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा ताफा हजर होता; परंतु  शेकडोंच्या संख्येने असलेले पुनर्वसित गावकरी हे जीवनोपयोगी साहित्य घेऊन मुलाबाळांसह  मेळघाटात गेले आहेत. यावेळी पुनर्वसित गावकर्‍यांची समजूत काढण्याकरिता अमोना गेटवर उ पवनसंरक्षक गुरुप्रसाद, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, उपविभागीय  पोलीस अधिकारी गावीत, ग्रामीण पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर यांच्यासह वन, महसूल व  पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ई-क्लासच्या शेतीचा  शोध घेऊन पुनर्वसित गावकर्‍यांना शेती देण्याबाबत प्रक्रिया राबविण्याच्या दिलेल्या आदेशानुसार  ई-क्लासची जमीन शोधण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले असल्याची माहिती प्राप्त झाली  आहे. 

टॅग्स :akotअकोटMelghatमेळघाटAkola Ruralअकोला ग्रामीण