अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य!
By Admin | Updated: February 12, 2015 01:19 IST2015-02-12T01:19:48+5:302015-02-12T01:19:48+5:30
विकास तर होईलच; आयुक्त सोमनाथ शेटे यांचे मत.

अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य!
अकोला : उत्पन्न वाढीची समस्या अनेक महापालिका, नगरपालिकांना भेडसावते. यामुळे विविध समस्या निर्माण होतात. त्यावर मात करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील. विकास कामे तर होतीलच; परंतु नागरिकांची खरी गरज लक्षात घेता, अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्यक्रम दिला जाणार असल्याचे मत आयुक्त सोमनाथ शेटे यांनी बुधवारी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केले. अकोला शहराच्या विकासासाठी मागील १४ वर्षांपासून भाजप-शिवसेना युतीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नरत असल्याचे चित्र आहे. एकीकडे विकास कामांचे दिवास्वप्न रंगविल्या जात असतानाच दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेतल्यास प्रशासनाच्या प्रामाणिकतेची कीव येते. शहरात ठिकठिकाणी पसरलेली घाण, अस्वच्छता अकोलेकरांच्या मुळावर उठली असून, प्रत्येक घराला आजाराचा विळखा आहे. धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असताना पाण्याची प्रचंड नासाडी सुरू आहे. अकोलेकरांजवळून कर वसूल करणारी महापालिका साध्या मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यास असर्मथ ठरली. यासह विविध मुद्यांवर नवनियुक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांना विचारणा केली असता, त्यांनी या सर्व समस्यांचे मूळ उत्पन्न वाढीत दडल्याचे नमूद केले. उत्पन्नाअभावी थकीत वेतनाची समस्या निर्माण होते. त्याचा परिणाम मूलभूत सुविधांवर होतो. वर्धा नगर परिषदेच्या माध्यमातून प्लास्टिक निर्मूलन व स्वच्छता मोहिमेवर भर देण्यात आला. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्याचे शेटे यांनी यावेळी सांगितले. प्लास्टिक पिशव्यांमुळे कचर्याची गंभीर समस्या निर्माण होते. त्यामुळे ४0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरणे नागरिकांनीसुद्धा बंद केले पाहिजे. पथदिवे, स्वच्छ रस्ते, पाणीपुरवठा व स्वच्छता या विषयांना प्राधान्य देणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यासाठी अधिकारी-कर्मचार्यांसह अकोलेकरांच्या समन्वयाची गरज त्यांनी अधोरेखित केली.