शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अकोला :  ही हलगर्जी कोरोनाचा प्रकोप वाढवणारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:28 AM

प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव, लोकांची बेफिकीर वृत्ती, यंत्रणेची हलगर्जी यामुळे अकोल्यात कोरोनाचा प्रकोप वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देवाढती रुग्णसंख्या, मृत्यूचा दर यामध्ये अकोला आघाडीवर आहे. दुकानांवरची गर्दी ओसंडून वाहताना दिसते.आता भाजी बाजार बंद केले; मात्र किराणांवरील गर्दी कमी होत नाही.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आले, संचारबंदी लावण्यात आली. अकोल्यात मात्र २२ मार्चचा जनता कर्फ्यू व त्यानंतरचे दोन दिवस बऱ्यापैकी शिस्त होती; नंतर मात्र डबलसीट, ट्रिपलसीटपासून रस्त्यावरच्या गर्दीचे चित्र कमी-अधिक फरकात कायमच राहिले. त्यात आता मूर्तिजापूरच्या घटनेनंतर प्रशासकीय हलगर्जीची भर पडली आहे. प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव, लोकांची बेफिकीर वृत्ती, यंत्रणेची हलगर्जी यामुळे अकोल्यात कोरोनाचा आणखी प्रकोप वाढवणारी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.अमरावती, नागपूर, औरंगाबादसारख्या मोठ्या शहरांच्या तुलनेत अकोल्याची लोकसंख्या व प्रगती एकदमच कमी आहे; मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत आपण टक्केवारीमध्ये या शहरांनाही मागे टाकले आहे. वाढती रुग्णसंख्या, मृत्यूचा दर यामध्ये अकोला आघाडीवर आहे. सद्यस्थितीत अकोल्यात ४४ प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत; परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत कमीच आहे.एकीकडे आरोग्य यंत्रणेतील योद्धा कोरोनाशी दोन हात करत जीवाची पर्वा न करता आपली सेवा देत आहेत, तर दुसरीकडे प्रशासकीय स्तरावर अक्षम्य अशी हलगर्जी दिसत आहे.हातगाडीवर मृतदेह नेण्याचा प्रकार असो की मूर्तिजापूरमध्ये अंत्यसंस्काराची घटना असो, प्रशासन डोळे झाकून काम करते का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. उल्हासनगर येथे मूर्तिजापूरसारखाच प्रकार घडला, कोरोनाचा चाचणी अहवाल येण्यापूर्वीच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व विधी पाळण्यात आल्या. केवळ २० लोकांना परवानगी असताना त्यापेक्षा अधिक लोक होते. अंत्यसंस्कार झाले त्या मृतकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांची तपासणी झाली असता तब्बल १० लोकांना बाधा झाल्याचे समोर आले. आता या प्रकरणात याप्रकरणी नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. हे उदाहरण ताजे असतानाच मूर्तिजापुरात चूक घडली त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, तरच भविष्यात दक्षता घेतल्या जाईल, कारण कोरोनाचे संकट मोठे आहे.

...तर नोडल आॅफिसरची मागणी होईलअकोल्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच आहे. दुसरीकडे यंत्रणांची हलगर्जी समोर येत आहे. पालकमंत्र्यांनी दोन दिवसांचा वर्ग घेतला. नेहमीच्या स्टाइलमध्ये हंगामा करण्यासाठी स्टिंगचा प्रयोगही केला. नंतर ‘जैसे थे’. सर्वोपचारमध्ये रुग्णांची होणारी हेळसांड, साधनांचा अभाव अशा अनेक गोष्टी या सोशल मीडियातून बाहेर येत आहेत. या सर्व बाबींमधून रुग्णांचा सर्वोपचारवर विश्वास डळमळीत होत गेला तर यंत्रणांनी आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल अन् सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी सोलापूरच्या धर्तीवर नोडल आॅफिसरची मागणी होईल. त्यामुळे आतापर्यंत परिश्रम घेतले आहेत. त्यामध्ये फक्त पारदर्शकता अन् सातत्य हवे तरच रुग्णांना सर्वोपचारचा अन् प्रशासकीय यंत्रणेचा आधार वाटेल.

किराणा नेता की कोरोना?लॉकडाउमध्ये जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांना सवलत दिली आहे; मात्र ही सवलत जणू बाहेर पडण्याची संधीच आहे असे समजून प्रत्येक दुकानांवरची गर्दी ओसंडून वाहताना दिसते. तेच चित्र भाजी बाजाराचेही होते. आता भाजी बाजार बंद केले; मात्र किराणांवरील गर्दी कमी होत नाही. दुकानांमध्ये जाणाºया बहुतेकांकडे मास्कही नसतात. फिजिकल डिस्टन्सिंग तर दूरच राहिले. अशा स्थितीत आपण किराणा नेतो की कोरोना, याचाही विचार नागरिकांनी केला पाहिजे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला