शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

अकोला एमआयडीसी जलपुनर्भरणापेक्षा कूपनलिका खोदण्यातच आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 3:21 PM

आपल्या परिसरात कोसळणाऱ्या पाण्याचे तरी जलपुनर्भरण करणे गरजेचे आहे. एमआयडीसी प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.

ठळक मुद्देपाण्याअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योग अडचणीत सापडले असून, येथील पाणीटंचाई उग्ररूप घेत आहे. एमआयडीसीतील सहाशेपैकी किमान दोनशे उद्योजकांकडे कूपनलिका आहेत. सहाशे उद्योगांपैकी केवळ बोटांवर मोजण्याएवढ्या साठ उद्योगांनी जलपुनर्भरणाची यंत्रणा लावली आहे.

अकोला : पाण्याअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योग अडचणीत सापडले असून, येथील पाणीटंचाई उग्ररूप घेत आहे. पाणीटंचाईची ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रशासन आणि एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत ठरत आहे.मागील वर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने अकोलेकरांवर जलसंकट आले आहे. एकीकडे पिण्यासाठी, तर दुसरीकडे उद्योगांना संजीवनी देण्यासाठी संघर्ष सुरू आहे. अकोल्यातील सहाशे उद्योगांना एमआयडीसी प्रशासनाकडून अत्यल्प पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पर्यायाने उद्योजकांना दररोज सातशे-पाचशे रुपयांप्रमाणे पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहेत. पाणीटंचाईच्या काळात प्रत्येकाजवळ भूगर्भातील जलसाठा उपलब्ध व्हावा म्हणून किमान आपल्या परिसरात कोसळणाऱ्या पाण्याचे तरी जलपुनर्भरण करणे गरजेचे आहे. एमआयडीसी प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. एमआयडीसीतील सहाशे उद्योगांपैकी केवळ बोटांवर मोजण्याएवढ्या साठ उद्योगांनी जलपुनर्भरणाची यंत्रणा लावली आहे. इतरांनी मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून कूपनलिका खोदल्या आहेत. त्याला एमआयडीसी प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. वास्तविक पाहता, कूपनलिका खोदण्याआधी परवानगी आवश्यक आहे. मात्र, एमआयडीसीतील सहाशेपैकी किमान दोनशे उद्योजकांकडे कूपनलिका आहेत. यातील किती अधिकृत आणि किती अनधिकृत आहेत, याचा शोध यंत्रणेने घ्यावा. जेव्हा भीषण पाणीटंचाई भेडसावते, तेव्हा उद्योजकांना प्रशासन आणि शासनाची आठवण होते. पण, स्वत: याला ते किती जबाबदार आहेत, याचा उद्योजक विचार करीत नाही. पाणी पुरवठा पाइपलाइन टाकणे आणि कुंभारी तलावाचे हस्तांतरण होणे, या बाबी उद्योजकांच्या हाती नसल्या, तरी जलपुनर्भरण मात्र त्यांच्या हाती आहे. यासाठी एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सर्वांना सक्तीचे निर्देश द्यावे. जिल्हा प्रशासन आणि एमआयडीसी प्रशासनानेदेखील आपल्या नेहमीच्या चौकटी सोडून पुढाकार घेत, या कामाला गती द्यावी. तरच एमआयडीसीतील पाणीटंचाईचा सामना करणे शक्य होईल.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ