शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

संचारबंदीमुळे अनेकांची कुटुंबीयांपासून ताटातूट

By atul.jaiswal | Published: March 28, 2020 10:34 AM

अकोला जिल्ह्यातील अनेक जण परजिल्ह्यात, तर पर जिल्ह्यातील काही विद्यार्थिनी अकोल्यात अडकून पडल्या आहेत.

ठळक मुद्देअनेक जण परजिल्ह्यात अडकून पडले आहेत. प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.परवानगी मिळत नसल्याने त्यांची कुटुंबीयांशी ताटातूट झाली आहे.

- अतुल जयस्वाल

अकोला : संचारबंदीमुळे अकोला जिल्ह्यातील अनेक जण परजिल्ह्यात, तर पर जिल्ह्यातील काही विद्यार्थिनी अकोल्यात अडकून पडल्या आहेत. मूळ गावी परतण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी मिळविण्यासाठी अडकून पडलेल्या विद्यार्थिनी गत चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत; परंतु परवानगी मिळत नसल्याने त्यांच्या पदरी अखेर निराशाच पडत असल्याचे वास्तव शुक्रवारी ‘लोकमत’च्या पाहणीतून समोर आले.जगभरात थैमान घालणाºया कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केल्यामुळे सगळीकडे संचारबंदी लागू करण्यात आली असून, राज्य व जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. बस व रेल्वेसेवासुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक जण परजिल्ह्यात अडकून पडले आहेत. अकोल्यातील काही जणांचे कुटुंब बाहेरगावी गेले आहे. तर परजिल्ह्यातील काही विद्यार्थिनींना अकोल्यात अडकून पडावे लागले आहे. ‘शुक्रवारी लोकमत चमू’ने जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पाहणी केली असता, काही विद्यार्थिनी, महिला व पुरुष निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या कक्षासमोर उभे असलेले दिसले. विचारणा केली असता, कोणी बाहेरगावी गेलेल्या पत्नी व मुलांना, तर कोणी बाहेरगावी शिकत असलेल्या आपल्या मुलीला आणण्यासाठी प्रशासनाकडून लिखित परवानगी घेण्यासाठी आल्याची माहिती समोर आली. ऋतुजा गजानन वावगे नामक महिलेने सांगितले, की त्यांची मुलगी काही दिवसांपूर्वी एका क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी औरंगाबाद येथे गेले होती. आता ती औरंगाबाद येथील वसतिगृहात एकटी असून, तिला परत आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे; परंतु प्रशासनाकडून चार दिवसांपासून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

वर्धेच्या विद्यार्थिनी अडकल्या!वर्धा येथील किरण आणि काजल वासेकर या दोन विद्यार्थिनी ‘नीट’ परीक्षेच्या शिकवणी वर्गासाठी अकोला येथे आल्या होत्या. संचारबंदीमुळे शिकवणी वर्ग बंद झाले आहेत. आता त्यांना परत घरी जायचे आहे; परंतु परवानगी मिळत नसल्याने त्या येथेच अडकून पडल्या आहेत.पत्नी व मुले बाहेरगावी अडकले!रोहन वानखडे यांना माहेरी गेलेली पत्नी व मुलांना परत आणण्यसाठी यवतमाळ येथे जायचे आहे. धीरज रंगवानी यांना जळगाव येथे तर कृष्णोरकर यांना जळगाव येथे जाणे गरजेचे आहे; परंतु परवानगी मिळत नसल्याने त्यांची कुटुंबीयांशी ताटातूट झाली आहे.कोण घेणार जबाबदारी?दुसºया शहरांमध्ये अडकून पडलेल्या कुटुंबातील सदस्यांना परत आणण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने अनेक जण तणावग्रस्त आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपल्या कुटुंबीयांना खासगी वाहनाद्वारे आणण्याचीही त्यांची तयारी आहे; परंतु प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने ते हतबल झाले आहेत. दुसºया शहरांमध्ये अडकून पडलेल्या आपल्या मुलाबाळांची सुरक्षा कोण घेणार, असा सवालही त्यांनी केला आहे.परजिल्ह्यात अडकून पडलेल्यांना परत आणणे गरजेचे आहे. अनेकांकडून परवानगीसाठी अर्ज येत आहेत. याबाबत विभागीय आयुक्तांसोबत चर्चा केली असून, विभागीय आयुक्तांनी या विषयी मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. शासनाकडून परवानगी मिळाली तर प्रशासनही नक्कीच परवानगी देईल.- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी अकोला.कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी बाहेर गेलेल्या लोकांना जिल्ह्यात येण्यापासून रोखणे गरजेचे आहे. आपत्कालीन वैद्यकीय कारणावरून आतापर्यंत एकालाच परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर कोणालाही परवानगी देण्यात आली नाही. नागरिकांनी काही दिवस सहकार्य करावे. - संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस