शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-खंडवा गेज परिवर्तन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून नको!

By atul.jaiswal | Updated: July 16, 2020 11:50 IST

अभयारण्याबाहेरच्या पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ठळक मुद्दे३८ किलो मीटरचा पट्टा हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जातो. व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील जैवविविधता धोक्यात येईल.बाहेरून नेण्याच्या फायद्यांचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

अकोला : दक्षिण-मध्य रेल्वेच्याअकोला ते खंडवा गेज परिवर्तनाचे काम मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून गेलेल्या मीटरगेज मार्गावर न करता त्यासाठी या अभयारण्याबाहेरच्या पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर व रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांच्याकडे मंगळवारी लिहिलेल्या एका पत्राद्वारे केली आहे.अकोला ते खंडवा या एकूण १७६ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचा ३८ किलो मीटरचा पट्टा हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जातो. यापैकी २३ किलोमीटरचा मार्ग हा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून जात असल्याने ब्रॉडगेज परिवर्तनाच्या कामाचा कधीही भरून न निघणारा परिणाम आधीच नामशेष होत असलेल्या वाघ व त्यांच्या अधिवासावर होईल. त्यामुळे गेज परिवर्तनासाठी या व्याघ्र प्रकल्पाबाहेरून जाणाऱ्या पर्यायी मार्गावर भर देणे योग्य राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या मेळघाटातील मीटरगेज मार्गाचेच गेज परिवर्तन झाल्यास या मार्गावर रेल्वेचे आवागमण वाढण्यासोबतच प्रदूषणातही वाढ होईल. यामुळे व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील जैवविविधता धोक्यात येईल. गाभा क्षेत्रातील १३ गावांचे पुनवर्सन करून हा भाग संरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील वन्य प्राण्यांच्या संख्येत लक्षनिय वाढ झाली आहे. आता याच भागातून ब्रॉडगेज रेल्वेमार्ग गेल्यास आतापर्यंत केलेले प्रयत्न मातीमोल होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व भारतीय वन्यजीव संस्था (डब्ल्यूआयआय) यांनीही व्याघ्र प्रकल्पाबाहेरचा पर्यायी मार्गच उत्तम राहील, अशी शिफारस केली होती, याकडेही मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे....हे तर नव्याने मार्ग टाकण्यासारखेचअकोला-खंडवा गेज परिवर्तनाच्या कामात केवळ गेज परिवर्तनच नव्हे, तर सध्या अस्तित्वात असलेल्या मीटरगेज मार्गावरील धोकादायक वळण सरळ करणे व बोगद्यांचाही समावेश आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून गेलेल्या २३.८ किमी मार्गावरील अति तीव्र वळण सरळ करण्याचे काम म्हणजे नव्याने रेल्वेमार्ग टाकण्यासारखेच होईल, या मुद्याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे.१०० गावे रेल्वे मार्गावर येतीलहा रेल्वेमार्ग मेळघाटातील वान अभयारण्याऐवजी बाहेरून नेण्याच्या फायद्यांचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आहे. पर्यायी मार्गाला हिरवी झेंडी दिल्यास मेळघाटातील जैवविधिता तर अबाधित राहीलच, सोबत बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद व संग्रामपूर तालुक्यातील जवळपास १०० गावे रेल्वेमार्गावर येतील. त्यामुळे या भागाचा विकास होण्यासही मदत होईल.

 

टॅग्स :Akola-Khandwa Gauge Conversionअकोला-खांडवा गेज रूपांतरणAkolaअकोलाUddhav Thackerayउद्धव ठाकरेpiyush goyalपीयुष गोयलPrakash Javadekarप्रकाश जावडेकरrailwayरेल्वे