शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

अकोला, मानो-यात शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2017 08:04 IST

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील दोन शेतक-यांनी आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला/मानोरा: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव येथील शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ जून रोजी सकाळी अकरा वाजता उघडकीस आली. वासुदेव रामकृष्ण थोटे असे मृतक शेतकर्‍याचे नाव आहे. मृतक वासुदेव थोटे यांच्याकडे सहा एकर शेती होती. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ७0 ते ८0 हजार रुपयांचे कर्ज थकीत होते. अपेक्षित उत्पन्न न झाल्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढतच होता. यावर्षीही दुबार पेरणीचे संकट असल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी शनिवारी शेतातील गोठय़ामध्ये गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे पाठविला. थोटे यांच्या पश्‍चात दोन मुले, तीन मुली, पत्नी, जावई व नातवंडे असा आप्त परिवार आहे. याविषयी माहिती मिळताच आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेऊन दु:ख व्यक्त केले. याप्रकरणी पुढील तपास बोरगावमंजू पोलीस करीत आहेत. दुसर्‍या घटनेत वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील मौजे जगदंबा नगर (हळदा) येथील अल्पभूधारक शेतकरी राजेश भगवान जाधव (वय ३५ वर्षे) यांनी वाढत्या कर्जाला कंटाळून शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. २३ जून रोजी यवतमाळ येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.मृतक शेतकरी जाधव यांच्या नावे जगदंबानगर शिवारात ४ एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांच्यावर विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेच्या गिरोली शाखेचे ५0 हजार रुपये थकीत कर्ज आहे. यासह सावकारी कर्ज, नातलगांकडून घेतलेले उसने पैसे आदी कारणांमुळे ते सतत चिंतातुर राहायचे, असे मृतकाच्या पत्नीने सांगितले. २२ जून रोजी नित्यनेमाप्रमाणे शेतात गेल्यानंतर तेथेच जाधव यांनी कीटकनाशक प्राशन केले. ही बाब कुटुंबीयास कळताच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचाराकरिता यवतमाळकडे रवानगी करण्यात आली; मात्र उपचारादरम्यान २३ जून रोजी मृत्यूशी झुंज देताना शेतकरी जाधव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.