शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अकोला, मानो-यात शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2017 08:04 IST

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील दोन शेतक-यांनी आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला/मानोरा: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव येथील शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ जून रोजी सकाळी अकरा वाजता उघडकीस आली. वासुदेव रामकृष्ण थोटे असे मृतक शेतकर्‍याचे नाव आहे. मृतक वासुदेव थोटे यांच्याकडे सहा एकर शेती होती. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ७0 ते ८0 हजार रुपयांचे कर्ज थकीत होते. अपेक्षित उत्पन्न न झाल्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढतच होता. यावर्षीही दुबार पेरणीचे संकट असल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी शनिवारी शेतातील गोठय़ामध्ये गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे पाठविला. थोटे यांच्या पश्‍चात दोन मुले, तीन मुली, पत्नी, जावई व नातवंडे असा आप्त परिवार आहे. याविषयी माहिती मिळताच आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेऊन दु:ख व्यक्त केले. याप्रकरणी पुढील तपास बोरगावमंजू पोलीस करीत आहेत. दुसर्‍या घटनेत वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील मौजे जगदंबा नगर (हळदा) येथील अल्पभूधारक शेतकरी राजेश भगवान जाधव (वय ३५ वर्षे) यांनी वाढत्या कर्जाला कंटाळून शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. २३ जून रोजी यवतमाळ येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.मृतक शेतकरी जाधव यांच्या नावे जगदंबानगर शिवारात ४ एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांच्यावर विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेच्या गिरोली शाखेचे ५0 हजार रुपये थकीत कर्ज आहे. यासह सावकारी कर्ज, नातलगांकडून घेतलेले उसने पैसे आदी कारणांमुळे ते सतत चिंतातुर राहायचे, असे मृतकाच्या पत्नीने सांगितले. २२ जून रोजी नित्यनेमाप्रमाणे शेतात गेल्यानंतर तेथेच जाधव यांनी कीटकनाशक प्राशन केले. ही बाब कुटुंबीयास कळताच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचाराकरिता यवतमाळकडे रवानगी करण्यात आली; मात्र उपचारादरम्यान २३ जून रोजी मृत्यूशी झुंज देताना शेतकरी जाधव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.