शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Akola: विदर्भात ४२६ किमी अंतराची नदी,कालव्याचे हाेणार निर्माण, आ.सावरकर यांची माहिती

By आशीष गावंडे | Updated: July 6, 2024 20:42 IST

Akola News: शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत राज्य शासनाकडून अनेक माेठे प्रकल्प,याेजना निकाली काढली जात आहेत. पावसाळ्यात भंडारा जिल्ह्यातील गाेसेखुर्द धरणातून माेठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. या पाण्याचा विदर्भातील आठ जिल्ह्यांत शेतीच्या सिंचनासाठी वापर करण्याच्या उद्देशातून नव्याने नदी व कालव्याचे निर्माण करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाकडून राबविला जाणार आहे.

- आशिष गावंडे अकाेला - शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत राज्य शासनाकडून अनेक माेठे प्रकल्प,याेजना निकाली काढली जात आहेत. पावसाळ्यात भंडारा जिल्ह्यातील गाेसेखुर्द धरणातून माेठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. या पाण्याचा विदर्भातील आठ जिल्ह्यांत शेतीच्या सिंचनासाठी वापर करण्याच्या उद्देशातून नव्याने नदी व कालव्याचे निर्माण करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाकडून राबविला जाणार आहे. यामुळे अकाेला जिल्ह्यासह आठ जिल्ह्यातील हजाराे हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. 

राज्य सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक याेजना व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. यामध्ये शेतकरी, उद्याेजक, व्यापारी, कष्टकरी महिला, बेराेजगार तरुणांसह युवतींसाठी अनेक याेजनांचा समावेश आहे. शासनाच्या महसुली उत्पन्नात वाढ झाल्यामुळे यातूनच यासर्व प्रकल्प व याेजनांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. आषाढीला पंढरपूरसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना रस्त्यात आराेग्य सुविधा देण्यासाठी निर्मल वारी याेजनेंतर्गत ३६ काेटी रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण याेजनेच्या अटी व निकष शिथील केले असून ३१ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. पिंक ऑटाे रिक्षा, १० लाख युवकांना राेजगार,मुख्यमंत्री अन्नपूर्णा याेजनेच्या माध्यमातून पात्र कुटुुंबाला तीन सिलींडर माेफत, महापालिका क्षेत्रात इलेक्ट्रिक बस सेवा अशा विविध नाविन्यपूर्ण याेजनांची पूर्तता केली जाणार असल्याची माहिती आ. रणधीर सावरकर यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला खासदार अनुप धाेत्रे, जिल्हाध्यक्ष किशाेर मांगटे पाटील, महानगराध्यक्ष जयंत मसने, माजी महापाैर विजय अग्रवाल उपस्थित हाेते.  जिल्ह्यात १ हजार एकर जमिनीवर साैरप्रकल्पशेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून जिल्ह्यातील शासकीय एक हजार एकर जमिनीवर साैर उर्जा प्रकल्प उभारल्या जाणार असल्याची माहिती आ.सावरकर यांनी दिली. या प्रकल्पातून तयार हाेणाऱ्या वीजेचा पुरवठा शेतकरी,उद्याेजकांना केला जाइल. अकाेला ते खंडवा ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्गमध्य प्रदेशला जाेडण्यासाठी अकाेला ते खंडवा ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्गाचे निर्माण व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु केल्याची माहिती खासदार अनुप धाेत्रे यांनी दिली. या महामार्गावरुन इंदाैर अवघ्या तीन तासांत गाठता येइल. यासह अकाेला ते नांदेड,अकाेला ते अकाेट जाण्यासाठी शहराबाहेरुन बायपास देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केल्याचे खा.धाेत्रे यांनी सांगितले.

टॅग्स :Akolaअकोला