शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अकोला-अमरावती महामार्गावर भरधाव ट्रकची दोन दुचाकींना धडक, ३ ठार

By atul.jaiswal | Updated: December 25, 2017 19:04 IST

अकोला : अकोल्याहून मुर्तीजापूरकडे जात असलेल्या भरधाव टिप्परने अकोल्याच्या दिशेने येत असलेल्या दोन दुचाकींना जारेदार धडक दिली. अकोला एमआयडीसी परिसरातील अप्पु पुतळ्याजवळ दुपारी २ वाजताच्या सुमारास लेल्या या अपघातात एका दुचाकीवरी दोन जण जागीच ठार झाले.

ठळक मुद्देअकोला एमआयडीसी परिसरातील अप्पु पुतळ्याजवळ दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला अपघात.यामध्ये एम. एच. ३० ए. डी. ४२४५ क्रमांकाच्या मोटारसायकलवरील दोघे जण जागीच ठार झाले. एम. एच. ३० झेड ५२६२ क्रमांकाच्या पल्सर दुचाकीवरील युवक या अपघातात गंभीर जखमी झाला.

अकोला : अकोल्याहून मुर्तीजापूरकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने अकोल्याकडे येत असलेल्या दोन दुचाकींना जारेदार धडक दिल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजता घडली. या अपघातात शिवणी येथील राहुल नगरमधील दोघे तर एक जन हिंगना रोडवरील रहिवासी असे तीघे जन ठार झाले आहेत.अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ चे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या कामामूळे अकोला ते बाभुळगाव परिसरात रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामूळे रोजच कीरकोळ अपघात होत आहेत. याच रोडवरील साहित्याची ने आण करण्यासाठी असलेल्या एम. एच. ३० ए. व्ही. १०५६ क्रमांकाचा ट्रक मुर्तीजापूरच्या दिशेने जात असताना शिवणी विमानतळासमोर रस्त्यावरील मोठया खड्डयांमूळे चालकाचे नियंत्रण सुटले व त्याने विरुद्ध दिशेने येणाºया एम. एच. ३० ए. डी. ४२४५ व  एम. एच. ३० झेड ५२६२ क्रमांकाच्या दोन दुचाकींना जबर धडक दिली. या अपघातात पुरवठा विभागात कार्यरत असलेले विनायक पंजाबराव वानखडे रा. हिंगना रोड, गजानन गोवींदराव सदांशिव रा. राहुल नगर शिवणी, श्रीकृष्ण दौलत तायडे रा. राहुल नगर शिवणी हे दुचाकीवरील तिघेही जन ठार झाले. शिवणी विमानतळाजवळ अप्पू पुतळ्यासमोर हा अपघात घडल्यानंतर नागरिकांनी धाव घेउन मृतक जखमी असल्याच्या कारणावरुन त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात पाठवीला, यामधील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला होता, तर तीसºया व्यक्तीचा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी पळून जाण्याच्या बेतात असलेला ट्रक चालक राजेंद्र सिंग  रा. झारखंड याला पोलिसांनी व नागरिकांनी ताब्यात घेतले. यावेळी अपघात झाल्यानंतर त्यांना मदत करण्यासाठी बाभूळगाव येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उन्मेष रिंंगणे, वैभव डोंगरे, संतोष भाकरे यांनी सहकार्य केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक विस्कळित झाली होती. मात्र पोलिसांनी तातडीने अपघातग्रस्त वाहने रोडच्या बाजुला करीत ही वाहतुक सुरळीत केली.

दोन दुचाकीवर बोलत जाणे धोक्याचे दोन्ही दुचाकीवरील व्यक्ती या बोलत दुचाकी चालवीत राष्ट्रीय महामार्गावरून जात असल्याची माहिती ट्रकचालकाने दिली. शहरात तसेच राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीवर दुचाकी चालवित असतांना गोष्टी करीत जाणारे आपल्याला नेहमीच दिसतात, अशाच प्रकारातून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरhighwayमहामार्गAccidentअपघात