शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आणखी तीन शहरांमध्ये वाढले हवा प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 13:59 IST

त्या शहरांमध्ये डोंबिवली, ठाणे व पिंप्री चिंचवड या महापालिकांचा समावेश आहे.

अकोला : राज्यातील १८ शहरांमध्ये हवा प्रदूषित असल्याने त्या संस्थांनी उपाययोजनांच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर आणखी तीन शहरांमध्ये हवा प्रदूषित असल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. त्या शहरांमध्ये डोंबिवली, ठाणे व पिंप्री चिंचवड या महापालिकांचा समावेश आहे.पर्यावरणातील महत्त्वाचा घटक तसेच सजीवांसाठी प्राणवायू असलेली हवा प्राणघातक ठरण्याच्या पातळीपेक्षाही अधिक प्रदूषित आहे. राज्याच्या १८ प्रमुख शहरांतील दूषित हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केलेल्या अ‍ॅक्शन प्लॅनची अंमलबजावणी करण्यास महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनच दिरंगाई करण्याचा प्रकार सुरू आहे.राज्यातील मुंबई, नाशिक, नवी मुंबई, पुणे, बदलापूर, उल्हासनगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, लातूर, जळगाव, अकोला व जालना या शहरांमध्ये हवा प्रदूषित असल्याचे हवेची गुणवत्ता तपासणी करणाऱ्या सेंटर्सचे अहवाल आहेत. त्या शहरांतील हवेची गुणवत्ता सुधारण्याचे निर्देश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले. त्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित महापालिकांच्या सहकार्याने प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार केला. उपाययोजना राबविण्यासाठी या दोनपैकी कोणत्याही यंत्रणेने हिरिरीने पुढाकार घेतल्याचे कुठेही दिसत नाही. त्यातच आता राज्यातील आणखी तीन शहरांची भर पडली आहे. त्यामध्ये डोंबिवली, ठाणे व पिप्री चिंचवड या महापालिकांनाही हवेची गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे.हवेतील विषारी घटकांचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा सजीवांवर होणारा विपरीत परिणाम रोखण्याची जबाबदारीही शासनाच्या संस्था, नागरिकांची आहे; मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात कोणीही पुढाकार घेत नसल्याने हा धोका वाढतच जाणार आहे.

 

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणAkolaअकोला