शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

कृषी विद्यापीठाचे कर्मचारी आंदोलनावर ठाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 10:46 IST

राज्यातील जवळपास १२ हजार कर्मचाऱ्यांनी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला.

अकोला: सातवा वेतन आयोग लागू करा, या मागणीसाठी १ नोव्हेंबरपासून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. मागण्या मान्य न करता शासनाने ‘काम नाही, तर वेतन नाही’ ही भूमिका घेतल्याने राज्यातील जवळपास १२ हजार कर्मचाऱ्यांनी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. सोमवारपासून राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील १२ हजार कर्मचारी सामूहिक रजेवर आहेत; मात्र कोरोनाच्या काळात सातवा वेतन आयोग लागू करण्यास थोडा अवधी लागू शकतो. अशा परिस्थितीत कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करणे योग्य नसल्याचे शासनाचे म्हणणे आहे. संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले असून ‘काम नाही, वेतन नाही’ हे धोरण लागू असल्याची आठवणदेखील शासनाने एका पत्राद्वारे शासनाने करुन दिली; मात्र ठोस आश्वासन मिळत नाही, तोर्यंत बेमुदत काम बंद आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघातर्फे घेण्यात आला. त्या अनुंषगाने सोमवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शहीद स्मारक येथे कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने दिली.

माजी मंत्री डॉ. पाटील यांची आंदोलनाला भेट

शासनाच्या धोरणानंतर कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदाेलनाला सुरुवात केली. कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना जोपर्यंत सातवा वेतन आयोग लागू होणार नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याची स्पष्ट भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, सोमवारी माजी मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात जाऊन आंदोलनकर्त्यांना भेट दिली. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी प्रशासनासोबत चर्चा करून योग्य मार्ग काढण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkolaअकोलाagitationआंदोलन