शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

कृषी विद्यापीठाचे कर्मचारी आंदोलनावर ठाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 10:46 IST

राज्यातील जवळपास १२ हजार कर्मचाऱ्यांनी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला.

अकोला: सातवा वेतन आयोग लागू करा, या मागणीसाठी १ नोव्हेंबरपासून राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. मागण्या मान्य न करता शासनाने ‘काम नाही, तर वेतन नाही’ ही भूमिका घेतल्याने राज्यातील जवळपास १२ हजार कर्मचाऱ्यांनी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. सोमवारपासून राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील १२ हजार कर्मचारी सामूहिक रजेवर आहेत; मात्र कोरोनाच्या काळात सातवा वेतन आयोग लागू करण्यास थोडा अवधी लागू शकतो. अशा परिस्थितीत कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करणे योग्य नसल्याचे शासनाचे म्हणणे आहे. संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले असून ‘काम नाही, वेतन नाही’ हे धोरण लागू असल्याची आठवणदेखील शासनाने एका पत्राद्वारे शासनाने करुन दिली; मात्र ठोस आश्वासन मिळत नाही, तोर्यंत बेमुदत काम बंद आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघातर्फे घेण्यात आला. त्या अनुंषगाने सोमवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शहीद स्मारक येथे कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने दिली.

माजी मंत्री डॉ. पाटील यांची आंदोलनाला भेट

शासनाच्या धोरणानंतर कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदाेलनाला सुरुवात केली. कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना जोपर्यंत सातवा वेतन आयोग लागू होणार नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याची स्पष्ट भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, सोमवारी माजी मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात जाऊन आंदोलनकर्त्यांना भेट दिली. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी प्रशासनासोबत चर्चा करून योग्य मार्ग काढण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkolaअकोलाagitationआंदोलन